आलिया भट्ट करण जोहरवर संतापली, माझं नाव घेऊ नकोस, वाचा काय घडलं?

| Updated on: Sep 29, 2022 | 2:17 PM

यंदाही या शोमुळे करण जोहरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. यंदाच्या हंगामात बाॅलिवूडमधील मोठ्या स्टारने शोमध्ये हजेरी लावली होती.

आलिया भट्ट करण जोहरवर संतापली, माझं नाव घेऊ नकोस, वाचा काय घडलं?
Follow us on

मुंबई : कॉफी विथ करणचे 7 वे (Koffee With Karan 7) सीजन नुकताच संपले आहे. करण जोहरचा शो कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. यंदाही या शोमुळे करण जोहरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. यंदाच्या हंगामात बाॅलिवूडमधील मोठ्या स्टारने शोमध्ये हजेरी लावली होती. करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये आमिर खान, गाैरी खान, करीना कपूर, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, अक्षय कुमार असे मोठे स्टार उपस्थित राहिले होते. मात्र, या शोदरम्यान खरी चर्चा झाली ती आलिया भट्टच्या (Alia Bhatt) नावाची…

कॉफी विथ करण सीजन 7 मध्ये प्रत्येक भागामध्ये आलिया भट्टचे करण जोहरने नाव घेतल्याचा आरोप केला जातोय. शोच्या लास्टच्या भागामध्ये करणने यावर स्पष्टीकरण दिले आहे. शोच्या ज्युरीने करण जोहरला विचारले की, शोमध्ये तू इतक्या वेळा आलिया भट्टचे नाव का घेतले? यावर स्पष्टीकरण देताना करण जोहर म्हणाला की, याविषयी माझ्यामध्ये आणि आलियामध्ये अगोदरच बोलणे झाले.

आलिया मला म्हणाली की, मी खूप जास्त आभारी आहे, पण आता शोमध्ये प्लीज माझे नाव घेऊ नको. दान‍िश सेठ करण जोहरला म्हणाला की, ब्रह्मास्‍त्र चित्रपटात आलिया भट्टने जेवढ्या वेळ शिवा शिवा म्हटले नाही, त्यापेक्षाही अधिक वेळा शोमध्ये तू आलिया, आलिया, आलिया म्हटले आहे.

त्यानंतर करण जोहर शोमधून थेट आलिया भट्टला फोन करतो. त्यावेळी आलिया म्हणते की, करण तू शपथ घे आणि म्हण की, यानंतर शोमध्ये तू माझे नाव कधीच घेणार नाही. हवे तर चुकीच्या गोष्टींसाठी माझे नाव घे…इतकेच नाही तर यावेळी बोलताना करण जोहर आणि आलिया भट्ट म्हणतात की, आपण लोकांना दाखवण्यासाठी फेक भांडणे देखील करूयात.