Naatu Naatu गाणे पूर्ण करण्यास तब्बल 17 महिन्यांचा कालावधी, लेखकाचा मोठा खुलासा

लेखक गीतकार चंद्रबोस यांनी एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांचे आभार मानले आहेत.

Naatu Naatu गाणे पूर्ण करण्यास तब्बल 17 महिन्यांचा कालावधी, लेखकाचा मोठा खुलासा
| Updated on: Jan 11, 2023 | 9:11 PM

मुंबई : आज सर्वत्र फक्त आणि फक्त एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू गाण्याची चर्चा सुरू आहे. याचे कारणने तेवढेच जबरदस्त आहे. कारण या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये डंका वाजवली. एसएस राजामौली यांच्यासह आरआरआर चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. नाटू-नाटू गाण्याने एक इतिहासच रचला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये 2023 मधील सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार नाटू-नाटू या गाण्याला मिळाला आहे. लेखक गीतकार चंद्रबोस यांनी एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांचे आभार मानले आहेत.

नाटू-नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर चंद्रबोस यांनी धन्यवाद मानत म्हटले, आजचा दिवस माझ्या आयुष्यामधील सर्वात आठवणीमध्ये राहणारा दिवस आहे. नाटू-नाटू गाण्याचा गीतकार असल्याने मला या यशाचा खूप जास्त आनंद आणि अभिमान वाटत आहे.

एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांचे मी स्पेशल आभार मानू इच्छित आहे. नाटू-नाटू गाणे पूर्ण तयार करण्यास १७ महिन्यांचा कालावधी लागला होता.

हे गाणे अर्ध्या दिवसांमध्येच ९० टक्के पूर्ण झाले होते. परंतू १० टक्के पूर्ण करण्यासाठी तब्बल १७ महिन्यांचा कालावधी लागला. नाटू-नाटू गाण्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांनी जबरदस्त डान्स केलाय.

नाटू-नाटू हे गाणे कालभैरव आणि राहुल यांनी गायले आहे. नाटू-नाटू गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी चित्रपट टीमचे अभिनंदन केले.