AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्यनच नाही तर ‘या’ बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा! पाहा कोण कोण यादीत सामील

शाहरुख खान अशा कलाकारांपैकी एक आहे, जो अनेकदा वाद टाळण्याचा प्रयत्न करतो. पण कोणाला वाटले होते की, शाहरुख खानचा मुलगा आर्यनला तुरुंगात जावे लागेल. अलीकडेच, NCB ने आर्यनसह 17 जणांना मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली.

आर्यनच नाही तर ‘या’ बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा! पाहा कोण कोण यादीत सामील
Aryan Khan
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : शाहरुख खान अशा कलाकारांपैकी एक आहे, जो अनेकदा वाद टाळण्याचा प्रयत्न करतो. पण कोणाला वाटले होते की, शाहरुख खानचा मुलगा आर्यनला तुरुंगात जावे लागेल. अलीकडेच, NCB ने आर्यनसह 17 जणांना मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली. न्यायालयाने आर्यन खानला 14 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे केवळ शाहरुख खानलाच नाही तर संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडचे सर्व स्टार्स एकापाठोपाठ एक शाहरुखच्या घरी पोहोचत आहेत. पण सर्व प्रयत्नांनंतरही शाहरुख आपल्या मुलाला एनसीबीच्या पकडीतून बाहेर काढू शकत नाहीय. आज जाणून घेऊया अशाच काही बॉलिवूड स्टार किड्स बद्दल ज्यांनी जेलची हवा खाल्ली आहे.

आर्यन खान

शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली होती. आर्यनने एनसीबीच्या ताब्यात कबूल केले होते की, तो मागील 4 वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे. न्यायालयाने आर्यनचा जामीन नाकारला आहे.

सूरज पांचोली

अभिनेत्री जिया खानने 2013 साली गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, तिने मागे एक सुसाईड नोटही सोडली होती. जियाने सूरज पांचोलीवर शारीरिक शोषण करणे, तिला गर्भपात करण्यास भाग पाडणे असे गंभीर आरोप केले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी सूरज पांचोलीला अटक केली. त्यानंतर त्याला तुरुंगात जावे लागले. मुंबई उच्च न्यायालयाने मात्र सूरजला दिलासा देत म्हटले की, तो जियाच्या आत्महत्येला जबाबदार नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे.

संजय दत्त

1993 मध्ये संजय दत्तला विमानतळावरून अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्याच्या घरातून अवैध शस्त्र मिळाल्याने ही अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्याला टाडा आणि आर्म्स अॅक्ट अटक करण्यात आली. या प्रकरणात 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती, जी नंतर कमी करून तीन वर्ष करण्यात आली. 2013 पासून संजय दत्त पुण्याच्या येरवडा कारागृहात होता आणि 2016 मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका झाली.

सलमान खान

2002 मध्ये सलमान खानची कार वांद्रेच्या फुटपाथवर चढली. यादरम्यान, त्याच्या कारखाली चिरडून एका मजुराचा मृत्यू झाला आणि चार लोक जखमी झाले. असे म्हटले जाते की, सलमान दारूच्या नशेत गाडी चालवत होता. त्यानंतर त्याला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले, पण नंतर त्याला जामीन मिळाला. 2015 मध्ये त्याला कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली. सलमान म्हणाला की, तो कार चालवत नव्हता, पण त्याचा ड्रायव्हर कार चालवत होता.

हेही वाचा :

Aryan Khan : ड्रग्स प्रकरण; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पोहोचला तुरुंगात, समोर आले फोटो

Aryan Khan drug case | शाहरुखला तिसऱ्यांदा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी !

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.