Breakup Story : सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये, नेमकं असं काय घडलं ज्याने रणबीर आणि कतरिनाला वेगळं व्हावं लागलं?

| Updated on: Mar 21, 2021 | 4:44 PM

रणबीर आणि कतरिनाच्या प्रेमाची आजही चर्चा होते. मात्र, असं नेमकं काय घडलं ज्यामुळे दोघांना वेगळं व्हावं लागलं? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Breakup Story Of Katrina Kaif and Ranbir Kapoor).

Breakup Story : सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये, नेमकं असं काय घडलं ज्याने रणबीर आणि कतरिनाला वेगळं व्हावं लागलं?
Follow us on

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यात जेव्हा प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली तेव्हा खूप चर्चा रंगली होती. याशिवाय त्याचं जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा देखील खूप चर्चा झाली. कतरिना आणि रणबीर जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, दोघांनी कधीही उघडपणे आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. ते वेगळे होऊन आता बराच कालावधी लोटलाय. तरीही आजदेखील रणबीर आणि कतरिनाच्या प्रेमाची चर्चा होते. मात्र, असं नेमकं काय घडलं ज्यामुळे दोघांना वेगळं व्हावं लागलं? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Breakup Story Of Katrina Kaif and Ranbir Kapoor).

कतरिना आणि रणबीरची प्रेमकहाणी

रणबीर आणि कतरिना यांचा 2009 मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ हा चित्रपट आला. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. दोघं या चित्रपटाच्या शूटिंगवेळी एकमेकांचे चांगले मित्र बनले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांच्या ‘राजनीती’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघांमधील नातं आणखी घट्ट बनलं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कतरिना आणि रणबीर यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगायला सुरुवात झाली. याच चित्रपटावेळी दोघांचा एकमेकांवर जीव जडला. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांशी बातचित करताना आणि एकमेकांना वेळ देताना दिसायचे.

दोघांचा फोटो व्हायरल

पुढे काही दिवसांनी रणबीर आणि कतरिना यांचे काही बोल्ड फोटो समोर आले. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या वृत्ताना दुजोरा देण्यात आला. त्यांच्या अफेअरची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. या फोटोत कतरिना बिकनीत दिसली होती. तर रणबीर बरमोडा पँटवर बीचवर दिसला होता (Breakup Story Of Katrina Kaif and Ranbir Kapoor).

रणबीर-कतरिनाच्या लग्नाचीही चर्चा

रणबीर आणि कतरिना यांचं लग्न होणार, अशा देखील चर्चा मधल्या काळात सुरु होत्या. 2014 साल उजाडल्यानंतर दोघांच्या प्रेमाबाबत जगजाहीर झालं होतं. दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघं एकमेकांमध्ये एवढे गुंतले की लग्न, लग्नानंतर मुलं या सगळ्या गोष्टींची त्यांनी आधीच प्लॅनिंग केल्याची चर्चा होती. मात्र, नियतीने वेगळंच काहीतरी लिहिलं होतं.

कतरिना आणि रणबीर यांचा कधी ब्रेकअप होईल, असा विचारही कुणाच्या मनात आला नव्हता. मात्र, अचानक ते वेगळे झाले. त्यांच्या ब्रेकअपमुळे अनेकांना धक्का बसला. त्यांच्यात ब्रेकअप का झाला? याबाबत काहीच माहिती समोर येत नव्हतं. त्यानंतर काही दिवसांनी आलेल्या बातम्यांनुसार रणबीर कपूरची आई नीता कपूर यांना कतरिना पसंत नव्हती, अशी माहिती समोर आली. त्याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा आला. मात्र, दोघांनीही या विषयावर कधीच भाष्य केलं नाही.

कतरिना नैराश्यात

दरम्यान, एका मुलाखतीत कतरिनाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. “कुणीही असूद्या, जुन्या गोष्टींबाबत माझ्या मनात काहीच नाही. कुणी माझं मन दुखवलंय, असं मला वाटत नाही. प्रत्येकजण स्वत: साठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेकदा काहीतरी चांगलं देण्याच्या नादात आपण स्वत:चं नुकसान करुन बसतो. त्यामुळेच मला मित्रांपेक्षा शत्रूंवर जास्त विश्वास आहे. ब्रेकअप वाईट आहे. ब्रेकअप या जगातील सर्वात वाईट आणि भयानक गोष्ट आहे. ब्रेकअपमुळे आयुष्यात आता काहीच राहीलं नाही, असं वाटतं”, असं कतरिना म्हणाली होती. रणबीर सोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना प्रचंड नैराश्यात गेली होती.

आता पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय

मात्र, आता पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. दोघंही आपल्या आयुष्यात पुढे गेलेत. रणबीर लवकरच आलिया भट्ट सोबत लग्न करण्याची शक्यता आहे. तर कतरिना आणि विकी कौशल यांच्याही प्रेम प्रकरणाची सध्या चर्चा आहे.

हेही वाचा : अमेरिकेची भारताला धमकी, रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टम खरेदी करण्यावर ‘ही’ भूमिका