AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT 2 | रागाच्या भरात सलमानने सोडला ‘बिग बॉस ओटीटी 2’ शो? नेमकं काय आहे कारण?

सलमान खान गेल्या बऱ्याच वर्षांपासून या शोचं सूत्रसंचालन करतोय. त्याल बिग बॉस या शोचा सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक मानलं जातं. मात्र अनेकदा स्पर्धकांना त्याच्यावर पक्षपातीचाही आरोप केला आहे. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडलेल्या काही स्पर्धकांनी सलमानवर बरेच आरोप केले होते.

Bigg Boss OTT 2 | रागाच्या भरात सलमानने सोडला 'बिग बॉस ओटीटी 2' शो? नेमकं काय आहे कारण?
सलमान खानImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 18, 2023 | 4:30 PM
Share

मुंबई | 18 जुलै 2023 : बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने केलं होतं. मात्र ओटीटीवरील हा पहिला सिझन तितका गाजला नव्हता. म्हणून या शोच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सिझनसाठी सूत्रसंचालक म्हणून सलमान खानला निवडलं. सलमानमुळे बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन पहिल्या एपिसोडपासूनच चर्चेत आला. म्हणून हा शो दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता. मात्र आता काही दिवसांतच सलमानने हा शो सोडल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. ‘बिग बॉस ओटीटी 2’मधील वीकेंड का वार या एपिसोड्सचं सूत्रसंचालन सलमान करतो. मात्र गेल्या वीकेंडला सलमानऐवजी कॉमेडियन कृष्णा अभिषेक या शोचं सूत्रसंचालन करताना दिसला. सलमान त्याच्या आधीच्या काही कामांमुळे त्या आठवड्यात बिग बॉसमध्ये दिसू शकला नाही, असं तेव्हा म्हटलं गेलं. मात्र आता त्यामागचं दुसरंच कारण समोर येत आहे.

गेल्याच्या गेल्या आठवड्यात जेव्हा वीकेंड का वार हा खास एपिसोड प्रसारित झाला, तेव्हा सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्याच्या हातात सिगारेट पहायला मिळाली. यावरूनच सलमान बिग बॉसच्या प्रॉडक्शन टीमवर जोरदार भडकला होता, असं कळतंय. याच कारणामुळे त्याने शो सोडल्याचंही म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर सलमान फक्त ओटीटी व्हर्जन नाही तर टीव्ही व्हर्जनवरील बिग बॉसचंही सूत्रसंचालन करणार नसल्याचं समजतंय.

बिग बॉस खबरी या सोशल मीडिया पेजवर बिग बॉससंबंधित सर्व अपडेट पोस्ट केले जातात. या पेजने सलमान शो सोडण्याविषयीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सलमान हा शो सोडण्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. पुढील आठवड्यात तो पुन्हा शोमध्ये दिसणार’, असं ट्विट या पेजवर करण्यात आलं आहे.

सलमान खान गेल्या बऱ्याच वर्षांपासून या शोचं सूत्रसंचालन करतोय. त्याल बिग बॉस या शोचा सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक मानलं जातं. मात्र अनेकदा स्पर्धकांना त्याच्यावर पक्षपातीचाही आरोप केला आहे. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडलेल्या काही स्पर्धकांनी सलमानवर बरेच आरोप केले होते. त्यानंतर त्याचा हातात सिगारेट असलेला फोटोही व्हायरल झाला होता. या सर्व कारणांमुळे नाराज झालेल्या सलमानने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे या चर्चांचं उत्तर आता प्रेक्षकांना येत्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्येच मिळणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.