AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमारसोबतच्या वादानंतर संजयने घेतली ‘वेलकम 3’मधून माघार? खरं कारण आलं समोर

अभिनेता संजय दत्तने 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातून माघार घेतली आहे. अक्षय कुमारसोबतच्या वादानंतर त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. मात्र त्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

अक्षय कुमारसोबतच्या वादानंतर संजयने घेतली 'वेलकम 3'मधून माघार? खरं कारण आलं समोर
Sanjay Dutt and Akshay KumarImage Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2024 | 3:45 PM
Share

‘वेलकम’ आणि ‘वेलकम 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘वेलकम 3’ची घोषणा झाली. ‘वेलकम टू द जंगल’ असं या तिसऱ्या भागाचं नाव असून त्याच्या टीझरमध्ये मुन्ना आणि सर्किट म्हणजेच संजय दत्त आणि अर्शद वारसी दिसले. त्यांच्यासोबतच अभिनेता अक्षय कुमारसुद्धा होता. संजय दत्त, अर्शद वारसी आणि अक्षय कुमार ही स्टारकास्ट पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता वाढली. मात्र या चित्रपटातून संजय दत्तने माघार घेतल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. अक्षयसोबतच्या वादामुळे संजू बाबाने प्रोजेक्ट सोडल्याची चर्चा होती. पण या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. संजयने अक्षयमुळे नाही तर आजारपणामुळे चित्रपट सोडल्याचं कळतंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्तने काही महिन्यांपूर्वीच हा प्रोजेक्ट सोडला होता. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर चित्रपटातील ॲक्शन सीन्स करता येत नसल्याने त्याने माघार घेतल्याचं कळतंय. “संजय दत्त या चित्रपटासाठी खूप उत्सुक होता आणि त्याने शूटिंगलाही सुरुवात केली होती. पण दुर्दैवाने मढ आयलँडमध्ये एका दिवसाच्या शूटिंगनंतर त्याने दिग्दर्शकांना कळवलं की तो आरोग्याच्या कारणास्तव पुढील शूटिंग करू शकणार नाही. हे काही महिन्यांपूर्वी घडलं होतं. कॅन्सरशी झुंज आणि त्यापुढील उपचारामुळे त्याला शूटिंग पूर्ण करणं जमलं नव्हतं. वेलकम 3 हा चित्रपट जरी कॉमेडी असला तरी त्यात बरेच ॲक्शन सीन्स आहेत. संजयच्या भूमिकेच्या वाटेला ते सीन्स अधिक आले आहेत. ते जमणार नसल्यानेच त्याने नकार दिला”, अशी माहिती सूत्रांनी दिली.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

संजय दत्तला स्टेज 4 फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये त्याने कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं. काही महिन्यांच्या उपचारानंतर तो कॅन्सरमुक्त झाला. ‘वेलकम 3’मधून संजयने माघार घेतल्यानंतर अभिनेता सुनील शेट्टीने त्याची जागी घेतली. या चित्रपटाची शूटिंग अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. यामध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, सुनील शेट्टी यांच्यासोबतच रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, परेश रावल, जॉनी लिव्हर, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक यांच्याही भूमिका आहेत. अहमद खान या चित्रपटाचं शूटिंग करत असून येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.