ही सुरुवात, आता मागे हटायचं नाही..; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. हेमंत ढोमे आणि तेजस्विनी पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

ही सुरुवात, आता मागे हटायचं नाही..; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया
तेजस्विनी पंडित, हेमंत ढोमे
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 25, 2026 | 3:16 PM

नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (शनिवार) राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘जंतर मंतर आणि देशभरातील परिस्थितीचा राष्ट्रविरोधी घटकांना फायदा होऊ नये, देश एकसंध राहावा, भारतातील विद्यार्थी कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नयेत आणि त्यांनी आपल्या अभ्यासावर, करिअरवर लक्ष केंद्रित करावं, हे सुनिश्चित करण्यासाठी मी पंतप्रधानांना माझी राजीनामा सादर केला आहे’, असं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मराठी कलाकारांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘मेरे युवा साथिंयो! आता सुरूवात झालीय, आता मागे हटायचं नाही,’ अशा शब्दांत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यांनी विद्यार्थी आंदोलकांचं अभिनंदन केलं आहे. तर ‘ज्यांनी ज्यांनी यासाठी लढा दिला, त्या सर्वांना प्रेम’, असं अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिलं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा देशभरातून निषेध व्यक्त झाला होता. बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील असंख्य सेलिब्रिटींनी त्यावर संताप व्यक्त केला होता.

कलाकारांच्या पोस्ट-

दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घडामोड समोर आली आहे. बैठकीनंतर त्यांनी सांगितलं होतं की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने एक दिवसाची मुदत मागितली आहे.

3 मे 2026 रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेत अनियमितता आढळून आली होती. याची तात्काळ दखल घेऊन भारत सरकारने सीबीआयकडे तपास सोपवला आणि परीक्षा रद्द केली. त्यानंतर फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. 21 जून 2026 रोजी यशस्वीरित्या ही फेरपरीक्षा पार पडली.

पहिल्या दिवसापासून मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही दूर फिरलो नाही, असं धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं. तसंच कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचं भविष्य परीक्षा माफियामुळे उद्ध्वस्त होऊ देणार नाही, तसंच कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा माझा दृढनिश्चय होता, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us