मनोज जरांगे गेल्यावेळी आलात, धिंगाणा केला घाण केली, आता… हिंदुस्थानी भाऊचे वादग्रस्त विधान, थेट..

Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, त्यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. अनेकजण जरांगे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यातच हिंदुस्थानी भाऊ यांनी मोठे विधान केले.

मनोज जरांगे गेल्यावेळी आलात, धिंगाणा केला घाण केली, आता... हिंदुस्थानी भाऊचे वादग्रस्त विधान, थेट..
Hindustani Bhau and Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 16, 2026 | 3:19 PM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नाही. मात्र, तरीही जरांगे मोठ्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले. गेल्या वर्षी याच दिवसात जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, यावेळी परवानगी देण्यात आली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा पोलिसांकडून परवानगी मागितली आहे. पण त्यावर पोलिसांनी निर्णय दिला नाही. मनोज जरांगे पाटील गेल्या 19 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. 19 तारखेपासून त्यांचे मुंबईतील उपोषण आहे. त्यांनी सुरूवातीला 5 हजार लोकांची परवानगी मागितली होती. पण तो अर्ज रद्द करण्यात आला. आता 50 लोकांची परवानगी त्यांनी मागितली. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.यादरम्यानच सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर विकास पाठक अर्थात हिंदुस्थानी भाऊ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

हिंदुस्थानी भाऊने मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी वादग्रस्त विधान केले. हिंदुस्थानी भाऊच्या विधानानंतर मराठा समाज आक्रमक भूमिका घेत आहे. मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत परिस्थिती बिघडताना दिसली. गेल्यावेळी आलात, धिंगाणा केला, घाण केली असे विधान थेट हिंदुस्थानी भाऊने केले.

जरांगे यांच्यावर टीका करताना हिंदुस्थानी भाऊने म्हटले की, आपले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सण सुरूवात मी 19 तारखेला मुंबईत येत आहे, गेल्या वेळी आलात तुम्ही त्यावेळी एवढा धिंगाना केला रस्त्यावर, मॉलमध्ये एवढी घाण केली की, तुम्ही सणाचीच तुम्ही वाट लावून टाकली. पूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होतो.यावेळीही तुम्ही येणार. लोकांचे सण खराब करणार. गेल्यावेळी तुम्ही तेच केले पाहिजे.

तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह होता.त्यावेली तुम्ही सर्व मराठा बांधवांना सांगितले आम्ही जिंकलो.त्यावेळी तुमचा वकील म्हणाला, दादा एकदा पेपर तपासा. त्यानंतर थोड्या दिवसांनी सांगता की, तुम्हाला फसवले. ऐकून घ्या हे शिकलेले आहेत. गुन्हे दाखल झालेत. त्यांच्या आई वडिलांन एवढा खर्च करूनते लढतायत. मराठ्यांची आताची जी पिढी आहे, त्यांना तुम्ही बरबाद करत आहेत. तुमची भाषा काय आहेत. शिंद्या… विख्या… देव्या… हलक्यात घेता का तुम्ही? जेवढे पत्र आहेत, त्यांना सर्वांना तुम्ही शिव्या देतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us