AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या चित्रपटाच्या म्युझिक डायरेक्टरचं निधन; वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांच्या मुलीचं 25 जानेवारी रोजी श्रीलंकेत निधन झालं. भवतारिणी असं त्यांचं नाव असून त्या तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका होत्या. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.

सलमान खानच्या चित्रपटाच्या म्युझिक डायरेक्टरचं निधन; वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ilaiyaraaja's daughter BhavathariniImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 26, 2024 | 10:27 AM
Share

चेन्नई : 26 जानेवारी 2024 | प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांची मुलगी आणि पार्श्वगायिका भवतारिणी यांचं गुरुवारी 25 जानेवारी रोजी निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या यकृताच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यावरील आयुर्वेदिक उपचारासाठी त्या श्रीलंकेला गेल्या होत्या. अखेर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भवतारिणी यांचं पार्थिव आज (शुक्रवार) चेन्नईला आणलं जाणार असून तिथेच अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. भवतारिणी या 47 वर्षांच्या होत्या. इलैयाराजासुद्धा सध्या श्रीलंकेत आहेत. या आठवड्याच्या अखेरीस ते एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार होते.

गायनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सुरुवातीला भवतारिणी यांच्या पित्ताशयात स्टोन झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र नंतर त्यांना यकृतचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. तोपर्यंत हा कॅन्सर अंतिम म्हणजेच चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला होता. भवतारिणी या इलैयाराजा यांच्या कन्या आणि कार्तिक राजा, युवान शंकर राजा यांच्या बहिणी होत्या. ‘भारती’ या तमिळ चित्रपटातील ‘माइल पोला पोन्नू ओन्नू’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. भवतारिणी या उत्कृष्ट पार्श्वगायिका आणि संगीतकार होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरु होते. उपचारासाठी त्यांना श्रीलंकेला नेण्यात आलं होतं. तिथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भवतारिणी यांचं करिअर

भवतारिणी यांनी ‘रासैया’ या चित्रपटापासून गायनक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी वडील इलैयाराजा आणि भाऊ कार्तिक, युवान यांच्यासाठी गाणी गायली होती. याशिवाय भवतारिणी यांनी देवा आणि सिर्पी या संगीतकारांसोबतही काम केलं आहे. 2002 मध्ये त्यांनी रेवती दिग्दर्शित ‘मित्र, माय फ्रेंड’ या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ‘फिर मिलेंगे’ आणि इतर काही चित्रपटांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘मायानदी’ हा म्युझिक अल्बम लाँच झाला होता. भवतारिणी यांनी ‘कढलुकू मरियाधाई’, ‘भारती’, ‘अझागी’, ‘फ्रेंड्स’, ‘पा’, ‘मंकटा’ आणि ‘आनेगन’ यांसारख्या तमिळ चित्रपटांमधील गाणी गायली आहेत.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला