जावेद अख्तर यांच्यावर भडकली कंगना, म्हणाली…

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

जावेद अख्तर यांच्यावर भडकली कंगना, म्हणाली...
| Updated on: Jan 21, 2021 | 6:42 PM

मुंबई : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. कंगनाने विविध मुलाखतीत त्यांची बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स पाठवला आहे. कंगनाला 22 जानेवारीला पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. आता या सर्व प्रकरणावर कंगना रनौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज परत एक समन्स आला आहे. तुम्ही मला तुरूंगात टाका आणि माझा छळ करा तरीही मी संघर्ष करेल, पाहिजे तर माझ्यावर 500 गुन्हे दाखल करा (Javed Akhtar vs Kangana Ranaut)

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल.

ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती. कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले होते. कंगना रनौतच्याविरोधात जावेद अख्तरने अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

आई बनल्यानंतर प्रथमच घराबाहेर पडली अनुष्का, सोबत लेकही…

Breaking News | मिर्झापूरचे दिग्दर्शक आणि OTT विरोधात सुप्रीम कोर्टाने काढली नोटीस, पाहा काय कारण!

कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स

(Javed Akhtar vs Kangana Ranaut)