AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसात किती कप चहा प्यावा; करीना कपूरच्या डायटिशियनने काय सांगितलं? म्हणाल्या दुपारी 4 नंतर चहा….

करीना कपूरच्या न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी चहाच्या सेवनाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. दिवसातून किती कप चहा घ्यावा याबाबतही सांगितलं आहे. तसेच त्यांनी दुपारी 4 नंतर चहा पिण्याबाबतही सल्ला दिला आहे. नक्की त्यांनी काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.

एका दिवसात किती कप चहा प्यावा; करीना कपूरच्या डायटिशियनने काय सांगितलं? म्हणाल्या दुपारी 4 नंतर चहा....
Kareena Kapoor's Nutritionist Reveals: How Many Cups of Tea a Day is HealthyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2025 | 2:38 PM
Share

अभिनेत्री करीना कपूर आपल्या डाएटबाबत किती काळजी घेते हे सर्वांना माहित आहे. ती योग्य तो आहार घेते तसेच योगा, व्यायाम करते. तसेच ती तिचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. करीनाची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर या देखील बऱ्याचदा तिच्या डाएटबाबत सांगत असतात तसेच हेल्थी टीप्सही देत असतात. अशाच एका गोष्टीबद्दल त्यांन सांगितलं आहे. ती गोष्ट म्हणजे चहा. एका व्यक्तीना दिवसातून किती कप चहा पिणे योग्य आहे? तसेच वेळ काय असावी हे देखील सांगितलं आहे.

सकाळी चहाने सुरुवात करावी का? 

आपल्यापैकी बऱ्याच जणांची सकाळ ही चहानेच होते. पण रुजुता यांच्या मते चहा न पिणे कधीही चांगले पण जर घ्यायचाच असेल तर तो सकाळी रिकाम्या पोटी घेऊ नये, त्यांच्यामते सकाळी चहाने सुरुवात करण्यापेक्षा कोणत्याही ताज्या फळाचा रस बनवून पिऊ शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, पचन चांगले होते आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता.

शरीराला झोपेतून अचानक जागे करतात 

त्यामुळे त्यांनी दिवसाची सुरुवात थेट चहा किंवा कॉफीने करण्यास नकार दिला आहे. यापूर्वीही तिने अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे की कॅफिन आणि सिगारेटसारखे उत्तेजक पदार्थ शरीराला झोपेतून अचानक बाहेर काढतात. यामुळे ब्लड प्रेशर, हार्ट रेट और ब्रीदिंग रेट वाढतं ज्यामुळे त्याचा शरीरावर ताण येतो.

Kareena Kapoor nutritionist

दुपारी 4 नंतर चहा न पिण्याचा सल्ला दिला

रुजुता यांच्या मते दिवसातून 2-3 कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नये. सामान्य व्यक्तीने यापेक्षा जास्त चहा पिणे योग्य मानले जात नाही. तसेच रुजुता यांनी दुपारी 4 नंतर चहा न पिण्याचा सल्ला दिला आहे. आपल्याला सकाळची सुरुवातसोबतच दुपारचा थकवा दूर करायचा असेल किंवा संध्याकाळी थोडं शांत रिलॅक्स वाटून घ्यायचं असेल तर आपल्या भारतीयांच्या मनात सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे चहा, पण रुजुता यांनी हाच दुपारचा चहा पिण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मते दुपारचा चहा घेतल्याने झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो.

चहा/कॉफीमध्ये साखर घालू शकता पण….

तसेच साखरेच्या प्रमाणाबद्दलही त्यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, ”डब्ल्यूएचओ आणि इतर जागतिक मधुमेह संघटना म्हणतात की दिवसाला 6 ते 7 चमचे साखर शरीरात जाणे ठीक आहे. त्यामुळे त्यानुसार तुम्ही चहा/कॉफीमध्ये साखर घालू शकता पण ते प्रमाणात. तसेच पॅकेज केलेल्या अन्न, नाश्त्यातील काही पदार्थ, बिस्किटे इ. आधीच साखर असलेले पदार्थ टाळा,” असही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही चहा घेऊ शकता पण तो नक्कीच प्रमाणात.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.