AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी फिनिक्स मॉलमध्ये कधीच जात नाही, मला खूप त्रास..; असं का म्हणाले महेश मांजरेकर?

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गिरणी कामगारांविषयी व्यक्त झाले. मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये कधीच शॉपिंगला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

मी फिनिक्स मॉलमध्ये कधीच जात नाही, मला खूप त्रास..; असं का म्हणाले महेश मांजरेकर?
महेश मांजरेकरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2025 | 9:58 AM
Share

मुंबई शहराच्या जडणघडणी गिरणी कामगारांचं मोलाचं योगदान आहे. 1982 मधील संपामुळे हा गिरणी कामगार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. अनेक गिरण्या बंद पडल्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले. या कामगारांना घरं मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या गिरणी कामगारांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. महेश मांजरेकर हे वडाळ्यात राहायचे, त्यामुळे तिथे अनेक गिरणी कामगारांची मुलं त्यांचे मित्र होते. त्यांचा संघर्ष डोळ्यांसमोर पाहिल्याने, मी कधीच फिनिक्स मॉलमध्ये शॉपिंगला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले महेश मांजरेकर?

“मी वडाळ्याला राहायचो. आजूबाजूला सगळे मिडलक्लास होते. समोर स्प्रिंग मिल, त्याच्यापुढे कोहीनूर मिल.. त्यामुळे आम्ही ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचो, ती सगळी मिल कामगारांची मुलं होती. मिल कामगारांच्या संपाचा मला अजूनही खूप त्रास होता. आमच्यासोबत मोहन नावाचा एक मुलगा क्रिकेट खेळायचा, नंतर तो गँगमध्ये गेला आणि त्याचा एन्काऊंट झाला. अशी इतरही खूप लोकं होती. सकाळी स्प्रिंग मिलचा भोंगा वाजला की सात वाजले, मग तीन वाजले.. यावरून आम्हाला टाइम कळायचा. मिल कामगारांच्या मुलांचं आयुष्य मला माहीत होतं.”

“त्यानंतर ‘आमच्या या घरात’ नावाचं एक नाटक आलं होतं. त्याने प्रभावित होऊन मी चित्रपट लिहिला. तिकडचं आमचं जे आयुष्य होतं, आमचे खूप मित्र आहेत तिथे मिलवाले. त्याचा त्रास मला अजूनही होतो. मी फिनिक्स मॉलमध्ये कधीच शॉपिंग करत नाही. कधीच नाही. माझी बायको मला नेहमी म्हणते, पण माझं म्हणणं आहे की इथे खूप लोकं मेली आहेत. हे मॉल जे उभं राहिलंय, ते कोणाच्या तरी प्रेतांवर उभं राहिलंय, असं माझं कायम म्हणणं आहे. माझी बायको, मुलं तिथे शॉपिंग करतात. पण मी साधा रुमालसुद्धा तिथून घेत नाही. मी तिथे जातच नाही. हे माझ्याकडून एक प्रकारचं आंदोलन आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

याविषयी ते पुढे म्हणाले, “मला त्याचा त्रास होतो. ते मिल कामगार कुठे आहेत? त्यांना काय मिळालं? काहीच नाही. माझ्या चित्रपटात एक वाक्य आहे की, महाराष्ट्राला मुंबई मिळाली, त्याच्यात लाखो कामगार आणि शेतकरी मेले. त्याचं प्रतीक फक्त एकच आहे, तो पुतळा.”

Follow Us
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.