RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार हा प्रसिद्ध अभिनेता?

तब्बल 18 वर्षांनंतर विराट कोहलीची स्वप्नपूर्ती झाली आहे. पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हा विजय मिळवला आहे. जर हा सामना आरसीबीने जिंकला तर मी विराट कोहलीचं मंदिर बांधेन, असं एका अभिनेत्याने म्हटलं होतं.

RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार हा प्रसिद्ध अभिनेता?
Virat Kohli
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2025 | 8:46 AM

विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची 18 वर्षांपासूनची आयपीएल जेतेपदाची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. बेंगळुरू टीमने मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत पंजाब किंग्जला सहा धावांनी पराभूत करत अखेर जेतेपदाची चव चाखली. या विजयासह विराट कोहलीचीही स्वप्नपूर्ती झाली. गेल्या 18 वर्षांपासून तो RCB टीमसोबतच आयपीएलमध्ये खेळत होता. या 18 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला मंगळवारी विजय अनुभवता आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्जच्या या अंतिम सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्साही होते. हा सामना सुरू होण्यापूर्वी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने म्हटलं होतं की आरसीबीने ही मॅच जिंकली तर तो विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार आणि विजय माल्याचे सर्व कर्ज फेडणार. आता RCB च्या या विजयानंतर त्या अभिनेत्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

विराट कोहलीचं मंदिर बांधणार असं वक्तव्य करणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून नकुल मेहता आहे. नकुलने ‘इश्कबाज’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर स्वत:चा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात अत्यंत उत्साहाने तो म्हणाला, “अखेर 18 वर्षांनंतर तो दिवस आला, जेव्हा आपण तो विजयचा कप उचलणार. मिस्टर 18 (कोहली) हा निर्विवादपणे आयपीएल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो यंदा पहिली ट्रॉफी उचलणार आहे. तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात का? आरसीबीने आपल्याला संयमाचा खरा अर्थ शिकवला आहे.”

“फक्त हा सामना जिंका आणि हा सामना जिंकल्यास मी वचन देतो की मी कन्नड भाषा शिकेन आणि हा व्हिडीओ पुन्हा अपलोड करेन. मी दाक्षिणात्य नाश्ता खाण्यासही सुरुवात करेन. जिथे वायफाय चांगला असेल तिथे मी राहायला जाईन. तुम्ही फक्त हा विजय प्राप्त करा आणि त्यासाठी मी सर्वकाही करायला तयार आहे. मी विराट कोहलीसाठी मंदिर बांधेन, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणातही रसम खाईन. मी विजय माल्याचंही सगळं कर्ज फेडेन. तुम्ही फक्त हा सामना जिंका”, अशी वचनं तो या व्हिडीओत देताना दिसतोय. त्यामुळे आता आरसीबीच्या विजयानंतर नेटकरी त्याच्या अकाऊंटवर कमेंट करून विराटच्या मंदिराबद्दल सवाल करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us