AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Bharadwaj Separated From Wife: महाभारताचा कृष्ण स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही, 12 वर्षानंतर पत्नीशी काडीमोड

महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नितीश भारद्वाज स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही.

Nitish Bharadwaj Separated From Wife: महाभारताचा कृष्ण स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही, 12 वर्षानंतर पत्नीशी काडीमोड
nitish bharadwaj
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 11:24 AM
Share

मुंबई: महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नितीश भारद्वाज स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही. नितीश भारद्वाजने पत्नी स्मिता गटेपासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 12 वर्षाच्या सुखीसंसारानंतर हे दोघेही विभक्त होत आहेत. या दोघांनाही दोन जुळ्या मुली असून या दोन्ही मुली आई स्मितासोबत इंदौरला राहतात.

स्मिता गटे या सनदी अधिकारी आहेत. सप्टेंबर 2019मध्येच या दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं होतं. मात्र, त्याबाबत नितीश भारद्वाज यांनी आता खुलासा केला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना नितीश भारद्वाज यांनी स्मितापासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

घटस्फोट मृत्यूपेक्षाही पॉवर फूल

मी सप्टेंबर 2019मध्ये स्मितापासून वेगळं होण्यासाठी मुंबईतील फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. आम्ही का वेगळं होत आहोत, त्याबाबत मी बोलू शकत नाही. मात्र, सध्या घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात पेंडिंग आहे. पण घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल असतो. जेव्हा तुम्ही अगदी एकटे होता तेव्हा याची अधिक जाणीव होते, एवढंच मी सांगू इच्छितो, असं नितीश भारद्वाजने म्हटलं आहे.

विवाह संस्थेवर विश्वास, पण…

माझा लग्न संस्थेवर भरोसा आहे. परंतु, माझ्या नशीबात ते नव्हतं. घटस्फोटाची अनेक कारणे असतात. कधी कधी तुमच्या अॅटिट्यूडशी तुम्ही तडजोड करत नसता, तर कधी कॅम्पेशनची कमी असते. कधी तुमचा अंहकार आडवा येतो तर कधी तुमचे विचार जुळत नाहीत. जेव्हा तुमचे नाते तुटते, तुम्ही विभक्त होता, तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होतो. मुलांवर या गोष्टींचा वाईट परिणाम होतो. त्याला जबाबदार पालकच असतात, असंही त्याने म्हटलं आहे.

नंतर पत्नीशी संपर्क साधला, पण…

जुळ्या मुलींशी संवाद होतो का? असा सवाल केला असता, त्यावर मी काहीच बोलू इच्छित नाही. माझ्या मुलींशी बोलण्याची मला मुभा आहे की नाही यावर मी बोलणार नाही, असं सांगतानाच नातं तुटल्यानंतर मी स्मिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही, असंही त्याने सांगितलं.

संबंधित बातम्या:

धनुष आता रजनिकांतचा जावई नाही राहिला! घटस्फोटासोबत धनुषच्या संसाराविषयीच्या 7 मोठ्या गोष्टी

Dhanush Aishwarya Divorce : अभिनेता धनुषचा रजनीकांतच्या मुलीला घटस्फोट; 18 वर्षानंतर दोघांचाही वेगळं होण्याचा निर्णय

Akshra Singh : अभिनेत्री अक्षरा सिंह सिम्पल लूकमध्ये, नेटकरी म्हणाले की…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.