मुंबई : काही प्रेमकथा अमर असतात अशीच एक प्रेमकथा (Love Story) आहे लोकप्रिय शो ‘पवित्र रिश्ता‘ (Pavitra Rishta)मधील अर्चना आणि मानवची. या शोनं इतिहास रचला आणि यासोबत या जोडीनं चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. एक दशकानंतरही अर्चना आणि मानव हे टीव्हीच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. वारसा पुढे नेताना, भारतातील सर्वात मोठं घरगुती OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ने शोचा नवीन अवतार – ‘पवित्र रिश्ता .. इट्स नेव्हर थू लेट’ चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे या शोमध्ये अंकिता लोखंडे पुन्हा एकदा अर्चनाची भूमिका साकारताना दिसणारआहे तर शाहीर शेख यावेळी मानवचं पात्र साकारताना दिसेल.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, ही मालिका मानव आणि अर्चना यांच्याभोवती केंद्रित एक रोमँटिक कौटुंबिक मालिका आहे, प्रत्येक भारतीय कुटुंबाची उत्कृष्ट सून आणि मुलगा आणि त्यांची दोन सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबं. इतर रोमँटिक मालिकांप्रमाणे, ‘पवित्र रिश्ता … इट्स नेव्हर दॅट लेट’ या प्रेमकथेची सुरुवात होईल.
पाहा प्रोमो
एकता कपूरनं व्यक्त केल्या भावना
बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एकता रवी कपूर म्हणाली, “काही शो आणि पात्रं तुमच्यावर पुढील अनेक वर्षांसाठी छाप सोडतात. ‘पवित्र रिश्ता’ हा असाच एक शो होता ज्यानं अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आणि जगभरातील चाहत्यांकडून खूप प्रेम आणि शुभेच्छा मिळवल्या. शो परत आणण्यासाठी आणि त्याच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नव्हती. मला खात्री आहे की चाहते पहिल्या सीझनइतकंच प्रेम आणि स्वीकृती या सीझनलासुद्धा देतील. ”
‘अर्चनाचा वारसा पुढे चालू ठेवण्याची संधी कशी नाकारणार?’
अंकिता लोखंडे म्हणाली, “क्वचितच एखादी व्यक्ती अशी भूमिका किंवा प्रकल्प करते जी त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलते. माझ्यासाठी पवित्र रिश्ता हा प्रकल्प होता कारण मला अर्चनाच्या पात्रासाठी प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम अतुलनीय होतं. मग, मी भूमिका पुन्हा बदलण्याची आणि अर्चनाचा वारसा पुढे चालू ठेवण्याची संधी कशी नाकारणार? पवित्र रिश्ता पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवल्याबद्दल मी एकता आणि झीची खूप आभारी आहे. मी पुन्हा आर्चूबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यास उत्सुक आहे. ”
‘माझ्यासाठी भावनांचा रोलरकोस्टर आहे..’
शहीर शेख, “हा शो माझ्यासाठी भावनांचा रोलरकोस्टर आहे – ही एक आव्हानात्मक भूमिका होती, परंतु मी तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शोचे शूटिंग करताना, मला जाणवलं की ‘मानव’ हे आजपर्यंतचं सर्वात प्रामाणिक आणि शुद्ध पात्र आहे आणि आजच्या काळात आणि युगात असे पात्र दुर्मिळ आहेत! . ”
संबंधित बातम्या
Shruti Marathe : श्रुती मराठेचा हटके ‘बॉर्बी डॉल’ लूक पाहिला का?; फोटो पाहून फॅन्स म्हणाले…