AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan 3 च्या लँडिंगनंतर राकेश रोशन जोरदार होऊ लागले ट्रेंड; कारण वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

"मागच्या वेळी जेव्हा राकेश रोशन चंद्रावर पोहोचले, तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारलं होतं की तिथून भारत कसा दिसतोय?", असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकरी राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांच्याबद्दलचे भन्नाट मीम्स शेअर करू लागले.

Chandrayaan 3 च्या लँडिंगनंतर राकेश रोशन जोरदार होऊ लागले ट्रेंड; कारण वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!
Rakesh RoshanImage Credit source: Twitter
| Updated on: Aug 24, 2023 | 8:21 AM
Share

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : 14 जुलै रोजी पृथ्वीवरून झेपावलेल्या चांद्रयान 3 च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं आणि भारताने नवा इतिहास घडवला. इस्रोने जाहीर केलेल्या वेळेवर संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करत असतानाचा सोहळा पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. एकीकडे संपूर्ण देशभरात ही मोहीम फत्ते झाल्याचा आनंद साजरा होत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. कारण चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल शुभेच्छा देताना ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राकेश रोशन यांचं नाव चुकून भारतीय अंतराळवीर म्हणून घेतलं. यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स व्हायरल करण्यास सुरुवात केली.

राकेश शर्मा आणि राकेश रोशन या दोन नावांमध्ये त्यांचा गोंधळ झाला आणि चुकून त्यांनी राकेश रोशन यांचं नाव घेतलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “मागच्या वेळी जेव्हा राकेश रोशन चंद्रावर पोहोचले, तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारलं होतं की तिथून भारत कसा दिसतोय?”, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकरी राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांच्याबद्दलचे भन्नाट मीम्स शेअर करू लागले.

पहा मीम्स

दरम्यान चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश ठरला. चार वर्षांपूर्वी याच महत्त्वाकांक्षेनिशी चंद्रावर झेपावलेले चांद्रयान 2 चंद्राच्या अगदी जवळ असताना कोसळलं होतं. त्या अपयशातून धडा घेत चांद्रयान 3 नव्या जिद्दीने, अधिक ताकदीने चंद्रावर पोहोचलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.