AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मेरी शादी खतरे मे है”; आईच्या निधनाच्या 5 दिवसांनंतर राखी सावंतचा ड्रामा पाहून भडकले नेटकरी

वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे डिप्रेशनचा सामना करतेय, असंही राखी म्हणाली. मात्र तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वैतागले आहेत. राखीने पुन्हा नवीन ड्रामा सुरू केला, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे.

मेरी शादी खतरे मे है; आईच्या निधनाच्या 5 दिवसांनंतर राखी सावंतचा ड्रामा पाहून भडकले नेटकरी
Rakhi SawantImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 01, 2023 | 6:57 PM
Share

मुंबई: आईच्या निधनानंतर पाच दिवसांनी अभिनेत्री राखी सावंतचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसतेय. मेरी शादी खतरे मे है, असं म्हणत ती पापाराझींसमोर जोरात हंबरडा फोडते. वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे डिप्रेशनचा सामना करतेय, असंही राखी म्हणाली. मात्र तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वैतागले आहेत. राखीने पुन्हा नवीन ड्रामा सुरू केला, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे.

राखीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की तिने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता आईच्या निधनानंतर तिचा नवीन व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘दररोज मीडियासमोर तमाशा करून ही दमत नाही का?’

‘राखीचा नवीन ड्रामा सुरू झाला’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘कृपया नवीन विषय घेऊन ये, आता आम्हाला हे काही मनोरंजक वाटत नाहीये’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा आदिलने राखीसोबतचं हे लग्न स्वीकारण्यास साफ नकार दिला होता. अशातच राखी मीडियासमोर ढसाढसा रडताना दिसली होती. तिने आदिलवर फसवणुकीचा आरोपदेखील केला होता. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने धर्म परिवर्तन केलं आहे. राखीने तिचं नाव बदलून ‘फातिमा’ असं ठेवलं. काही दिवसांनंतर आदिलनेही या लग्नाविषयी खुलासा केला आणि राखीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

पापाराझींसमोर राखी नेहमीच कोणता ना कोणता ड्रामा घेऊन येते. त्यामुळे तिचा हा नवीन व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीसुद्धा वैतागले आहेत. राखीच्या या व्हिडीओमागे नेमकं सत्य काय आहे, हे मात्र राखीच सांगू शकते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.