AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 4 वर्षांनी घटस्फोट, दुसऱ्याकडून विश्वासघात..; 8 वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री नैराश्यात

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. आठ वर्षे नैराश्याचा सामना केल्याचं तिने सांगितलं आहे. ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री असून लग्नाच्या चार वर्षांनंतर तिचा घटस्फोट झाला होता.

लग्नाच्या 4 वर्षांनी घटस्फोट, दुसऱ्याकडून विश्वासघात..; 8 वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री नैराश्यात
प्रसिद्ध अभिनेत्री Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 13, 2026 | 10:12 AM
Share

रश्मी देसाई ही टेलिव्हिडन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक हिट मालिकांमध्ये काम करून ती घराघरात लोकप्रिय झाली. रश्मी तिच्या मालिकांसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. रश्मीचं लग्न, घटस्फोट यांबद्दल सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक टप्प्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. जवळपास आठ वर्षांपर्यंत नैराश्याचा सामना केल्याचा खुलासा तिने यावेळी केला. ‘उतरन’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेली रश्मी खऱ्या आयुष्यात इतक्या कठीण काळाचा सामना करत असेल, याची कल्पनासुद्धा तिच्या चाहत्यांनी केली नसेल. भावनिक ताणामुळे मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम झाल्याचं तिने सांगितलं.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत रश्मी म्हणाली, “एक वेळ अशी होती, जेव्हा मी आठ वर्षे नैराश्याचा सामना करत होती. त्यातून बाहेर पडायला मला वेळ लागला. कारण माझ्यावर प्रचंड भावनिक ताण होता. सर्वकाही सुरळीत करण्यासाठी आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी मला काही वर्षांचा काळ लागला. आता पुन्हा एकदा मी हळूहळू रुळावर येत आहे. मला असं वाटतं की याबाबतचे निर्णय तुम्हाला स्वत:लाच घ्यावे लागतात. तुमचा प्रवास दुसरा कोणीच ठरवू शकत नाही. मला कामातून मानसिक शांती मिळते. मी काम करत राहिल्यामुळे यातून बाहेर पडू शकते, हे मला फार उशिरा समजलं होतं. आता मी काम आणि खासगी आयुष्य यांच्यातील संतुलन राखण्यात यशस्वी ठरतेय.”

रश्मीने पुढे हेसुद्धा मान्य केलं की, तिला खूप उशिरा या गोष्टीची जाणीव झाली की काम ही तिची सुरक्षित जागा बनली आहे, जिथे ती तिच्या भावना व्यक्त करू शकते आणि वैयक्तिक समस्यांमध्येही स्थिरता मिळवू शकते. आता कामासोबतच भावनिक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देत असल्याचं तिने स्पष्ट केलं. रश्मीने मालिकांसोबतच ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 6’, ‘नच बलिए 7’ आणि ‘झलक दिखला जा7’ यांसारख्या शोजमध्येही काम केलंय.

याआधी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत रश्मीने इंडस्ट्रीमध्ये तिच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या घटनेबद्दल सांगितलं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा सामना केल्याचा खुलासा तिने केला होता. “मला एका ऑडिशनसाठी बोलावलं होतं. मी तिथे गेले तेव्हा मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी कसंबसं तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाली आणि काही तासांनंतर मी माझ्या आईला याबद्दल सर्वकाही सांगितलं”, अशी धक्कादायक घटना रश्मीने सांगितली होती.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं