AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood : साडी उतरवणार ना किस देणार… ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याआधी रवीना टंडनने ठेवल्या होत्या ‘या’ अटी!

'टिप टिप बरसा पाणी' गाण्यामुळे रविना टंडन चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. पण रविनाने आधी या गाण्यासाठी नकार दिला होता. त्यामागचं कारण देखील तिनं सांगितलं होतं.

Bollywood : साडी उतरवणार ना किस देणार... 'टिप टिप बरसा पानी' गाण्याआधी रवीना टंडनने ठेवल्या होत्या 'या' अटी!
| Updated on: May 31, 2023 | 11:28 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रविनानं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. रविनाचं टिप टिप बरसा पाणी हे गाणं तर सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यामुळे ती अजूनही चर्चेत येते. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. आजही प्रेक्षक हे गाणं तितक्याच आवडीने पाहतात.

‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्यामुळे रविना टंडन चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. पण रविनाने आधी या गाण्यासाठी नकार दिला होता. त्यामागचं कारण देखील तिनं सांगितलं होतं. रवीना म्हणालेली की हे गाणं किती कामुक असेल याची काळजी तिला वाटत होती. पण नंतर तिला निर्मात्यांनी पटवून दिल्यानंतर ती हे गाणं करायला तयार झाली.

द न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत रवीनाला टिप टिप बरसा पाणी या गाण्याबाबत विचारलं होतं. यावेळी रवीनाला हे गाणं करताना संकोच का वाटत होता याबाबत सांगितलं. यावेळी तिनं सांगितलं की sexuality आणि sensuality यामध्ये एक मोठी रेष असते.

रविनानं सांगितलं की, तिच्या मते पूर्ण अंग झाकूनही कोणीही सेक्सी दिसू शकते. हे सगळं त्यांच्या चेहर्‍याचे हावभाव आणि डोळ्यांवर अवलंबून असते. टिप टिप बरसा पाणी गाण्याबाबत बोलताना मी स्पष्टपणे सांगितलं होते की, माझी साडी उतरणार नाही, किस केलं जाणार नाही, त्यामुळे या गाण्यावर टिकच्या ऐवजी क्रॉसचे चिन्ह जास्त होते. त्यानंतर आम्ही टिप टिप बरसा पाणी गाणं घेऊन आलो.

दरम्यान, ‘मोहरा’ या चित्रपटात रविना टंडन सोबत अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि नसीरूद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सोबतच या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं होतं, ज्यामध्ये टिप टिप बरसा पाणी सोबत तू चीज बडी है मस्त मस्त हे गाणंही हिट ठरलं होतं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.