9 ते 18 ऑगस्टला मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार, सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट, पोलिसांनी थेट..
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टने मोठी खळबळ उडाली. थेट मुंबईवर दहशतवादी हल्ला कधी होणार या आशयाची पोस्ट ही शेअर करण्यात आली. या पोस्टनंतर मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आलेत.

मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून घटनेची गंभीर दखल घेतलीये. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @AstroPrashnath9 या हँडलवरून ऑगस्ट 2026 दरम्यान भारतासाठी धोक्याचा इशारा देणारी पोस्ट करण्यात आली. ही पोस्ट शेअर करण्यात आल्याने खळबळ उडाली. या पोस्टमध्ये 9 ते 18 ऑगस्ट हा अतिशय धोकादायक कालावधी असून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मोठ्या हल्ल्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली. ही पोस्ट इंग्रजीत असून यात “India shall be careful in the month of August 2026…9th to 18th August very dangerous time period…Big terrorist attacks possible by Pakistani. Terrorists. असे म्हटले आहे. अनेकांनी ही पोस्ट रिशेअर देखील केली.
सोशल मीडियावर मुंबईबाबत दावा करणारी धक्कादायक पोस्ट
ही पोस्ट @tstark86v1 या हँडलद्वारे टॅग करून पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पोलिसांकडून या पोस्टची दखल घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून धमकीचे मेसेज आणि फोन सतत मुंबई पोलिसांना येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ताज हॉटेल उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली होती.
दहशतवादी हल्ला होणार असल्याच्या दाव्यानंतर पोलिस अलर्ट
हेच नाही तर भारतीय विमान कंपन्यांनाही विमानात बॉम्ब हल्ल्याचा फोन किंवा मेल येण्याच्याही घटना सतत घडत होते. ज्याचा फटका विमान कंपन्यांना सहन करावा लागला. त्यामध्येच आता सोशल मीडियावर अशाप्रकारची पोस्ट शेअर करण्यात आली. पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीकडे याबाबत काही माहिती आहे का? याचा तपास हा केला जात आहे.
India shall be careful in the month of August 2026… 9th to 18th August very dangerous time period… Big terrorist attacks possible by Pakistani Terrorists… https://t.co/kCJi5WDTQq
— Prashanth Kini (@AstroPrashanth9) August 4, 2026
पोलिसांनी घेतले पोस्टला अत्यंत गांर्भियाने थेट चाैकशी
मुंबई पोलिसांनी ही पोस्ट अत्यंत गांर्भियाने घेतला. यासंदर्भात चाैकशी सुरू आहे. कधी कोणत्या सरकारी इमारतीला तर कधी कोणत्या अभिनेत्याच्या घराला उडवण्याची धमकी दिली जाते. आता तर थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुंबईवर कधी मोठा हल्ला होऊ शकतो, असे म्हटल्याने अधिक खळबळ उडाली.
