AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

sushant singh rajput| तुरुंगात इतर कैद्यांसोबत कशी होती रिया हिची वागणूक; एक महत्त्वाची गोष्ट अखेर समोर आलीच

सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात तुरुंगात राहिलेल्या रिया चक्रवर्ती हिची एक गोष्ट अखेर समोर आलीच... इतर कैद्यांचा निरोप घेताना अभिनेत्रीने केली अशी गोष्ट

sushant singh rajput| तुरुंगात इतर कैद्यांसोबत कशी होती रिया हिची वागणूक; एक महत्त्वाची गोष्ट अखेर समोर आलीच
| Updated on: Jul 01, 2023 | 11:10 AM
Share

मुंबई | अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात तुरुंगात होती. सध्या रिया MTV Roadies S19 मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री सोशल मीडियावर आणि माध्यमांपासून दूर होती. पण आता अभिनेत्रीने भूतकाळ विसरून भविष्याकडे उत्तम वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत प्रेम संबंध असल्यामुळे अभिनेत्रीवर सुशांतच्या निधनानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. ज्यामुळे रिया हिला काही काळ तुरुंगात देखील राहवं लागलं होतं. रियावर सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्स देण्याचे आरोप लावण्यात आले होते.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणार रिया हिला भायखाळा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अशात तुरुंगात अभिनेत्रीची वागणूक कशी होती आणि इतर कैद्यांसोबत अभिनेत्री कशी वागत होती… या सर्व गोष्टींचा खुलासा अभिनेत्रीच्या वकील सुधा भारद्वाज यांनी केला आहे. सध्या सर्वत्र रिया आणि तिच्या तुरुंगातील दिवसांची चर्चा सुरु आहे.

रिया हिच्या तुरुंगातील दिवसांबद्दल सांगताना सुधा भारद्वाज म्हणाल्या, ‘तुरुंगातील इतर कैद्यांना रिया हिचा स्वाभाव आवडत होता. कारण ती इतर कैद्यांसोबत मिळून-मिसळून राहत होती. सामान्य व्यक्तींप्रमाणे रिया तुरुंगातील कामे करत होती. जेव्हा रिया हिची सुटका झाली तेव्हा तिला सोडण्यासाठी इतर कैदी गेट पर्यंत आल्या होत्या..’

पुढे सुधा भारद्वाज म्हणाल्या, ‘रिया फक्त कैद्यांसोबत चांगली राहत नव्हती तर, अभिनेत्रीने तिच्याकडे असलेल्या पैशांमधून सर्व कैदी महिलांमध्ये मिठाई वाटली होती..’ दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अडकलेल्या रिया हिला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.

नुकताच रोडीज शोमध्ये एका मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. यावर रिया हिने देखील सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर घडलेली एक गोष्ट सांगितली. अभिनेत्याच्या निधनानंतर रिया हिला अनेकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. रिया हिला अनेक नावे देखील देण्यात आली होती. पण होत असलेल्या विरोधाचा सामना करत रियाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

रिया म्हणाली, ‘मला अनेकांनी अनेक गोष्टी ऐकवल्या. लोक मला खूप काही बोलत होते. पण लोक बोलत आहेत म्हणून मी ती गोष्ट कधीच मान्य करणार नाही.. मी लोकांसाठी माझं आयुष्य का थांबवू? असं मी कधीच करणार नाही…’ सध्या सर्वत्र रिया हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.

फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत.
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.