पुन्हा-पुन्हा ऐकलं तर मन भरणार नाही, 48 वर्षांपूर्वीचं अमिताभ यांचं सुपरहिट गाणं, मुंबईच्या रस्त्यांवर झालं शूट
48 वर्षांपूर्वीचं अमिताभ बच्चन यांचं मुंबईच्या रस्त्यांवरील प्रचंड सुपरहिट गाणं. जे ऐकताच प्रत्येकजण जागेवरच गुणगुणतो. आजही त्या गाण्याने लाखो चाहत्यांना लावलंय वेड.

1978 साली प्रदर्शित झालेला मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय प्रेमकथांपैकी एक मानला जातो. अपूर्ण प्रेम, विरह, वेदना आणि त्याग यांचे भावपूर्ण चित्रण या चित्रपटात करण्यात आले होते. त्यामुळेच चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

या चित्रपटातील ‘ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. चित्रपटाची कथा एकतर्फी आणि अपूर्ण प्रेमाभोवती फिरते. सिकंदर (अमिताभ बच्चन) राखीवर प्रेम करतो, पण आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही.

राखी मात्र विनोद खन्नांवर प्रेम करते. दुसरीकडे रेखा साकारलेली जोहरा सिकंदरवर जीवापाड प्रेम करते, तर अमजद खानचे पात्र जोहरावर एकतर्फी प्रेम करत असते. त्यामुळे प्रत्येक पात्राच्या आयुष्यात प्रेम असले तरी ते पूर्णत्वाला जात नाही.

चित्रपटातील आणखी एक संस्मरणीय प्रसंग म्हणजे ‘ओ साथी रे’ गाण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांचा लांबलचक संवाद. हा तब्बल 16 पानांचा संवाद लेखक कादर खान यांनी लिहिला होता. अमिताभ बच्चन यांनी तो प्रभावीपणे साकारला आणि तो प्रसंग चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झाला.

याच चित्रपटातील 'रोते हुए आते हैं सब' हे गाणं इतकं सुपरहिट ठरलं की एकदा कानावर पडलं तरी लोक लगेच गुणगुणतात. आजही हे गाणं लोक प्रचंड आवडीने ऐकतात.