AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sai Pallavi: काश्मिरी पंडित आणि गाईंच्या तस्करीबद्दल साई पल्लवीचं विधान; नेटकरी संतापले

तिने व्यक्त केलेल्या या मतावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी साईचं मत योग्य असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sai Pallavi: काश्मिरी पंडित आणि गाईंच्या तस्करीबद्दल साई पल्लवीचं विधान; नेटकरी संतापले
Sai Pallavi: साई पल्लवी म्हणते, "काश्मिरी पंडितांची हत्या आणि गाय तस्करीच्यावेळी केलेलं लिंचिंग यात काहीच फरक नाही"Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 12:23 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. साई सध्या तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तिने नुकतीच एक मुलाखत दिली असून ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत साईने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवलेला काश्मिरी पंडितांचा नरसंहार (Kashmir genocide) आणि गाईंची कत्तल केल्याने मुस्लीम चालकाची केलेली हत्या (lynching for cow smuggling) या दोन्ही गोष्टी चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. तिने व्यक्त केलेल्या या मतावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी साईचं मत योग्य असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाली साई पल्लवी?

“मी तटस्थ भूमिका घेण्याला प्राधान्य देते. कारण मला लहानपणापासूनच हे शिकवलं गेलंय की तू चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. ज्यांच्यासोबत अन्याय होतोय, त्यांची मदत कर. कोणी लहान, कोणी मोठा असं काही नसतं. अशाच वातावरणात मी लहानाची मोठी झाले. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी फार ऐकलंय, पण यात कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे सांगता येणार नाही. द काश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादाबद्दल बोलायचं झाल्यास, गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लीम चालकाला मारण्यात आलं आणि त्यावेळी जय श्री रामच्या घोषणा दिल्या गेल्या. मग तेव्हा जे घडलं आणि आता जे घडतंय त्यात काय फरक आहे? आपण चांगली व्यक्ती म्हणून वागलो तर इतरांना आपण दुखावणार नाही. जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे असो किंवा उजवे न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तुम्ही कुठेही असलात तरी तटस्थ म्हणून वागाल आणि विचार कराल”, असं ती म्हणाली.

पहा तिच्या मुलाखतीचा व्हिडीओ-

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

काहींनी साईच्या मताचं समर्थन केलंय तर काहींनी नरसंहार आणि गाईंच्या तस्करीबद्दल केलेली हत्या या दोन गोष्टी एकच नसल्याचं म्हटलंय. गाईंची तस्करी करणं हा मुळात गुन्हा असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ट्विटरवर तिच्या या मुलाखतीवरून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

साई पल्लवीचा ‘विराट पर्वम’ हा चित्रपट येत्या 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत राणा डग्गुबत्ती मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती ‘गार्गी’ या चित्रपटातही झळकणार आहे. गौतम रामचंद्रन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत