कोरोनानं आयुष्य नेगेटीव्ह झालंय? सलमान खानच्या बापाची ही मुलाखत नव्यानं विचार करायला लावेल!

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे हजारो बळी जात आहेत. सरकार नवनवे निर्बंध आणत आहे. यासगळ्यात कुठेतरी सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होऊ लागला आहे.

कोरोनानं आयुष्य नेगेटीव्ह झालंय? सलमान खानच्या बापाची ही मुलाखत नव्यानं विचार करायला लावेल!
सलीम खान
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 5:22 PM

मुंबई : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे हजारो बळी जात आहेत. सरकार नवनवे निर्बंध आणत आहे. यासगळ्यात कुठेतरी सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होऊ लागला आहे. या सगळ्या परिस्थितीला तोंड देत असताना सामान्य माणूस काहीसा नकारात्मकतेकडे झुकत चालला आहे. तुम्हालाही या वातावरणात असंच काहीस वाटत असेल, तर सलमान खानचे वडील अर्थात लेखक सलीम खान (Salim Khan) यांचा हा व्हिडीओ नक्की बघा (Salim Khan interview will give you a positive vibe).

आयुष्य म्हणजे काय? आपण ते कसं जगावं आणि त्याला कसं सामोरं जावं, हे जाणून घ्यायचं असेल तर, सलीम खान यांचे हे शब्द नक्की ऐकले पाहिजेत. आयुष्य केवळ चौकटीत न बांधता त्यातील पैलू उलगडून जगता आलं पाहिजे, याबद्दल सलीमजींनी स्वतःचे काही अनुभव शेअर करत सांगितले आहे.

पाहा सलीम खान यांची मुलाखत

मुलं मोठी झाली की जगू हा विचार डोक्यात होता!

सलीम खान म्हणतात की, ‘मी नेहमी विचार करायचो की मुलं मोठी होतील, ती स्थिरस्थावर होतील. मुलं मार्गी लागली की आपण छान फिरू, आयुष्य जगू, असा विचार मी केला होता. पण जेव्हा पाच मुलं पदरी पडली तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी पाचपट काम करावं लागलं. सगळ्या गोष्टींसाठी मुलं माझ्यावर अवलंबून होती. मग त्यावेळी मला माझं काम थांबवावं लागत होतं. आताही त्यांना माझी तितकीच गरज असते. त्यामुळे तो वेळ मी त्यांना देतो.’(Salim Khan interview will give you a positive vibe)

चूक करणं ही चूक नाही!

पुढे सलीम खान म्हणतात, ‘आयुष्यात चुका केल्याच पाहिजेत. माझ्या मुलांनीही केल्या, पण मी त्यांना समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. त्यांच्या चुकातून त्यांना शिकू दिलं. चूक करणं ही चूक नाही, तर चूक न करणं ही चूक आहे. कारण चुकांमधून आपण शिकतो. मात्र, तीच तीच चूक पुन्हा पुन्हा करणं मात्र मोठी चूक आहे, जी आपण टाळली पाहिजे.

आयुष्य आपल्या हातात नाही, जे घडतंय ते घडू द्या…

या व्हिडीओच्या 37व्या मिनिटाला सलीमजींनी चक्क रुमालाचा आधार घेऊन आयुष्याचं गणित समजावून सांगितलं आहे. या वेळी सलीमजी हातात रुमाल पकडून म्हणतात, आपलं आयुष्य या रुमालाच्या टोकाप्रमाणे आहे. जन्म आणि मृत्यू या रुमालाच्या दोन बाजू आहेत. ना जन्म आपल्या हातात आहे ना मृत्यू…आपण दोन्ही गोष्टीं आपल्या मनाप्रमाणे ठरवून करू शकत नाही. यातील एखादी जरी गोष्ट आपल्या हातात असती, तर मात्र चित्र वेगळं असतं. मात्र, जर या दोन्ही गोष्टी आपण मनाप्रमाणे करू शकत नाही तर, मधल्या इतर गोष्टी का? मधल्या काळातही आपण शांत बसून नाही राहू शकत, कारण जे व्हायचं ते होतंच! म्हणून जे घडतंय ते घडू द्या!

(Salim Khan interview will give you a positive vibe)

हेही वाचा :

Puglya : मराठी सिनेमाचा ‘मॉस्को’त डंका, ‘पुगल्या’ला सर्वोत्तम पुरस्कार

‘दिल की तपिश’ कोण ग्रेट गातं? 11 वर्षाची अंजली की 14 वर्षाची? राहुल देशपांडेंच्या तोडीची गायकी? बघा सर्वाधिक पाहिले जाणारे Videos

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.