
आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी पडद्यामागे सुरु असलेल्या वाईट गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यामुळे बॉलिवूडची एक काळी बाजू देखील समोर आली. आता देखील अभिनेता सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय. सलमान खान याच्यासोबत ‘वीर’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान आता मोठ्या पडद्याापासून दूर आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत झरीन हिने ‘हेट स्टोरी 2’ बद्दल मोठा खुलासा केला आहे. सिनेमानंतर अभिनेत्रीला टीकेचा सामना करावा लागला… सांगायचं झालं तर, सिनेमात बॉक्स ऑफिसवर हीट ठरला, प झरीन हिला बॉलिवूडमध्ये नवीन संधी मिळाल्या नाहीत.
झरीन हिने पूजा भट्ट हिच्या पॉडकास्टमध्ये ‘हेट स्टोरी 3’ सिनेमाच्या सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे इंडस्ट्रीतील अनेकांनी झरीन हिच्या वाईट विचार करण्यास सुरुवात केली… जरीन खान म्हणाली, “हेट स्टोरी 3 नंतर, चित्रपटसृष्टीतील लोक मला तुच्छतेने पाहू लागले. अनेक जण म्हणाले की, ती अभिनय करू शकत नाही, म्हणून तिने तिचे कपडे काढले.”
झरीन हिला ‘हेट स्टोरी 3’ नंतर ‘अक्सर 2’ सिनेमासाठी विचारण्यात आलं… दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं… अभिनेत्रीने खुलासा केला की सुरुवातीला तिला सिनेमाबद्दल सांगितलेली कथा “हेट स्टोरी 3” सारखी नव्हती आणि ती पूर्णपणे वेगळी होती. पण, जेव्हा चित्रीकरण सुरू झालं तेव्हा तिच्या लक्षात आलं की सिनेमा अनेक किसींग सीन आणि रिवीलिंग कपडे आहेत…
झरीन म्हणाली, ‘मला इंग्रजीमध्ये स्क्रिप्ट ऐकवली आणि सांगितलं आपण हेट स्टोरी बनवत नाही.. एका नव्या जॉनरचा सिनेमा आहे… असंच काही त्यांनी मला सांगितलं होतं. पण मी जेव्हा सेटवर पोहोतली, तेव्ही प्रत्येक सीनेमाचा शेवट किसने व्हायचा किंवा मला अचानक ब्रा सारखे दुसरे कपडे घालण्यासाठी सांगितलं जायतं… ‘
‘मी निर्मात्यांना सांगितलं, हे सीन करायला मला काहीच हरकत नाही. पण मला स्क्रिप्ट वेगळीच दिली होती. याबद्दल मला काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं… दिग्दर्शक निर्मात्याला एक गोष्ट सांगायचा तर, मला आणि माझ्या कॉस्च्युम डिझायनरला दुसरी गोष्ट सांगायचा.’
पुढे झरीन म्हणाली, ‘त्या लोकांनी असं यासाठी केलं, कारण पूर्वी देखील मी ते सीन केलेले होते… मी नाटकी नाही. मला माहित आहे की, यामध्ये लोकांचे पैसे यात गुंतलेले आहेत, म्हणून मी काहीतरी मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. पण सिनेमा पूर्ण होईपर्यंत, तणाव इतका वाढला होता की मला स्क्रीनिंगलाही बोलावले गेलं नाही. मला काम न करण्यायोग्य म्हणून लेबल लावण्यात आले.’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.