AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मोठा ट्विस्ट; व्यक्तिरेखांची झाली अदलाबदल

साधीभोळी गौरी आता शालिनीच्या अवतारात दिसणार आहे तर चलाख शालिनी ही बिचाऱ्या गौरीच्या अवतारात दिसणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना कसा वाटणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मोठा ट्विस्ट; व्यक्तिरेखांची झाली अदलाबदल
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मोठा ट्विस्टImage Credit source: Tv9
| Updated on: Feb 03, 2023 | 7:58 PM
Share

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कथेच्या गरजेनुसार नवनव्या पात्रांची एण्ट्री होत असते. मात्र असं क्वचितच घडलं असेल जेव्हा एखाद्या मालिकेतील व्यक्तिरेखांचीच अदलाबदल झाली असेल. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत व्यक्तिरेखांची अदलाबदल झाली आहे. साधीभोळी गौरी आता शालिनीच्या अवतारात दिसणार आहे तर चलाख शालिनी ही बिचाऱ्या गौरीच्या अवतारात दिसणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना कसा वाटणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

मालिकेतील या व्यक्तिरेखांची बदल चिमुकल्या लक्ष्मीच्या सांगण्यावरून झाला आहे. राजहट्ट आणि बालहट्ट यांपुढे सर्वांनाच झुकावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे लक्ष्मीच्या इच्छेखातर आता शिर्केपाटील कुटुंबात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. जयदीपच्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीचा बराच छळ केला. गौरी ही घराची मालकीण असूनही शालिनीने तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली. मात्र जयदीप आता जयवंत देशमुख बनून परत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

शालिनीला धडा शिकवण्यासाठी त्याने आणि लक्ष्मीने मिळून हा नवीन अदलाबदलीचा डाव आखला आहे. म्हणूनच गौरी ही शालिनी झाली आहे तर शालिनी ही आता गौरी झाली आहे. गौरीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा अशी प्रेक्षकांची इच्छा होती. त्यामुळेच कथेत हा खास बदल करण्यात आला आहे.

मालिकेच्या पुढील एपिसोड्समध्ये शालिनीला गौरी कशी अद्दल घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू ही गौरी, मंदार जाधव हा जयदीप आणि माधवी निमकर ही शालिनीच्या भूमिकेत आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....