AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिला नवरा 18 वर्षांनी मोठा तर दुसरा 8 वर्षांनी लहान; दोघांपासून आहेत 3 मुले, कोण आहे ही अभिनेत्री?

एका बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रीची लव्हलाईफ सध्या फारच चर्चेत आहे. सुरुवातीला अभिनेत्रीने तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठ्या पुरुषाशी लग्न केलं पण काही वर्षांनी घटस्फोट होताच ही अभिनेत्री तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली. कोण आहे ही अभिनेत्री?

पहिला नवरा 18 वर्षांनी मोठा तर दुसरा 8 वर्षांनी लहान; दोघांपासून आहेत 3 मुले, कोण आहे ही अभिनेत्री?
Tanaz Irani Love LifeImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2025 | 2:54 PM
Share

बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत असे अनेक स्टार आहेत ज्यांची प्रेमकहाणी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. मग त्या रेखा असो, जया बच्चन असो, सुष्मिता सेन असो, आलिया भट्ट असो किंवा मग दीपिका पदुकोण. अशा बऱ्याच अभिनेत्रींच्या लव्ह लाईफबद्दल चाहत्यांना माहित आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत, जिने टीव्ही इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने फार कमी वयात तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठ्या पुरुषाशी लग्न केलं. परंतु त्यानंतर तिला खूप अडचणींना सामोरं जावं लागल्याचं तिने सांगितलं होतं.

अभिनेत्री आणि तिच्या पहिल्या पतीमध्ये आहे 18 वर्षांचा फरक 

ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडपासून ते टीव्ही जगतापर्यंत अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी तनाज इराणी. तनाज ही कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तनाज इराणीने पहिले लग्न 1992 मध्ये फरीद कुरीमशी केले होते. ते एक रंगमंच आणि नाटक कलाकार होते. त्यावेळी अभिनेत्री फक्त 20 वर्षांची होती आणि तिचा माजी पती 38 वर्षांचा होता. दोघांमध्ये 18 वर्षांचा फरक होता.

लग्नाच्या 8 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे झाले

तनाजने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लिम पुरूष फरीद कुरीमशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या एका वर्षानंतर, तिला मुलगी झाली. परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. दोघांनीही 8 वर्षांच्या लग्नानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. तथापि, तिच्या पहिल्या लग्नामुळे अभिनेत्रीला खूप त्रास सहन करावा लागला. सर्वप्रथम, तिला तिच्या स्वतःच्या समुदायाचा सामना करावा लागला.

अभिनेत्रीने सांगितले की त्यांचे लग्न तुटण्याचे कारण

तिच्या एका मुलाखतीत, तनाजने सांगितले होते की, फरीदचा अभिनय आणि त्याची काम करण्याची पद्धत तिला आवडली, म्हणून तिने त्याच्याशी लग्न केले. फरीद आणि तानाजमध्ये 18 वर्षांचा वयाचा फरक होता. पण त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही. अभिनेत्रीने सांगितले की त्यांचे लग्न तुटण्याचे कारण वयाचा फरक होता. इतकेच नाही तर तिला पारसी समुदायातूनही काढून टाकण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Tannaz Irani (@tannazirani_)

घटस्फोटानंतर अभिनेत्री 8 वर्षांनी लहान अभिनेत्यांच्या प्रेमात

तिच्या एका मुलाखतीत, तानाजने सांगितले की तिचा पहिला पती फरीद कुरीम रंगमंच आणि नाटक कलाकार होता. सिद्धार्थ कन्ननशी झालेल्या संभाषणात तिने सांगितले की तिला फरीदचा अभिनय आणि त्याची काम करण्याची पद्धत आवडली, म्हणून त्यांनी लग्न केले. फरीद आणि तानाजमध्ये १८ वर्षांचा वयाचा फरक होता, पण त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही. अभिनेत्रीने सांगितले की त्यांचे लग्न तुटण्याचे कारण वयाचा फरक होता. इतकेच नाही तर तिला पारसी समुदायातूनही काढून टाकण्यात आले.

तथापि, घटस्फोटानंतर, ती पुन्हा प्रेमात पडली आणि तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान अभिनेत्याशी तिने लग्न केलं. हा अभिनेता म्हणजे बख्तियार इराणी आहे. ज्यांच्यापासून तिला दोन मुले आहेत. बख्तियार आणि तनाज यांची पहिली भेट 2006 मध्ये ‘गुरुकुल’च्या शूटिंग दरम्यान झाली आणि एका वर्षानंतर म्हणजे 2007 मध्ये त्यांनी लग्न केले. तनाजची मोठी मुलगी जानी तिच्या वडिलांसोबत राहते, पण ती अनेकदा तनाजला भेटायला येते. तनाजने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण टीव्हीशी असलेले तिचे नाते तिने कधीही तोडले नाहीत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.