AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारका मेहता का उल्टा चष्मा मालिका बंद होणार? नाही दिसणार जेठालाला आणि बबिता?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका ऑफ एअर होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या १५ वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. टीआरपीमध्ये देखील ही मालिका अव्वल आहे. दयाबेन परत येणार असल्याची देखील चर्चा होती.

तारका मेहता का उल्टा चष्मा मालिका बंद होणार? नाही दिसणार जेठालाला आणि बबिता?
tmkoc
| Updated on: Dec 07, 2023 | 5:26 PM
Share

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्ही मालिका 15 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका अजूनही सर्वात लोकप्रिय आहे. मालिका इतक्या वर्षापासून हसवण्याचं काम करत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की दयाबेन शोमध्ये परत येणार आहे. या बातमीनंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. कारण दयाबेनशिवाय मालिकेच मज्जा येत नाही. दिशा वकानीने २०१७ मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला. ती अद्यापही परतली नाही. ती शोमध्ये कधी परतणार याची वाट चाहते पाहत आहेत. पण आता हा शो ऑफ एअर होणार असल्याचे बोलले जात आहे.

तारक मेहता मालिका बंद होणार का?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ 15 वर्षांनंतर प्रेक्षकांची निरोप घेणार आहे. येत्या काही महिन्यांत मालिका संपणार असल्यातं बोललं जात आहे. पण ही एक अफवा असल्याचं कळत आहे. मात्र निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही.

दयाबेन पुन्हा येणार

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ताज्या एपिसोडमध्ये दयाबेन पुन्हा येणार असल्याचं म्हटलं आहे. जेठालाल खूप आनंदी आहे, कारण सुंदरने त्याला आश्वासन दिले आहे की तो दिवाळीच्या वेळी दयाला गोकुळधाममध्ये परत आणेल आणि त्याच्या वचनानुसार सुंदरलाल आता दयाला जेठालालकडे परत आणण्यास तयार आहे.

या बातमीने जेठालाल, बापूजी आणि टप्पू सगळे आनंदाने भरून आले. या आनंदात गोकुळधाम सोसायटीचे सदस्यही सहभागी झाले असून त्यांनी दया परतीच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. मात्र, तारक मेहता जरा चिंतेत आहे. सुंदर लाल इथेही काही फसवणूक करेल असे त्यांना वाटते.

याआधी शैलेश लोढा आणि जेनिफर मिस्त्री यांनी देखील या शोला अलविदा म्हटले आहे. त्यांनी हा शो सोडल्यापासून वेगवेगळ्या आरोपांमुळे शो चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत अनेक स्टार्सनी या शोचा निरोप घेतला आहे. टप्पूची भूमिका करणारा राज अनडकट याने शो सोडला आहे.

चाहत्यांना दयाबेनच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. सप्टेंबर 2017 मध्ये, ती प्रसूती रजेवर गेली आणि परत आली नाही. मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, असित कुमार मोदी यांनी एक मोठी घोषणा केली होती, ज्यामध्ये ते म्हणाले होते की, तो लवकरच चाहत्यांची आवडती दिशा वकानी उर्फ ​​दयाबेनला परत आणणार आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.