AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारका मेहता का उल्टा चष्मा मालिका बंद होणार? नाही दिसणार जेठालाला आणि बबिता?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका ऑफ एअर होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या १५ वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. टीआरपीमध्ये देखील ही मालिका अव्वल आहे. दयाबेन परत येणार असल्याची देखील चर्चा होती.

तारका मेहता का उल्टा चष्मा मालिका बंद होणार? नाही दिसणार जेठालाला आणि बबिता?
tmkoc
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 07, 2023 | 5:26 PM
Share

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्ही मालिका 15 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका अजूनही सर्वात लोकप्रिय आहे. मालिका इतक्या वर्षापासून हसवण्याचं काम करत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की दयाबेन शोमध्ये परत येणार आहे. या बातमीनंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. कारण दयाबेनशिवाय मालिकेच मज्जा येत नाही. दिशा वकानीने २०१७ मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला. ती अद्यापही परतली नाही. ती शोमध्ये कधी परतणार याची वाट चाहते पाहत आहेत. पण आता हा शो ऑफ एअर होणार असल्याचे बोलले जात आहे.

तारक मेहता मालिका बंद होणार का?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ 15 वर्षांनंतर प्रेक्षकांची निरोप घेणार आहे. येत्या काही महिन्यांत मालिका संपणार असल्यातं बोललं जात आहे. पण ही एक अफवा असल्याचं कळत आहे. मात्र निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही.

दयाबेन पुन्हा येणार

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ताज्या एपिसोडमध्ये दयाबेन पुन्हा येणार असल्याचं म्हटलं आहे. जेठालाल खूप आनंदी आहे, कारण सुंदरने त्याला आश्वासन दिले आहे की तो दिवाळीच्या वेळी दयाला गोकुळधाममध्ये परत आणेल आणि त्याच्या वचनानुसार सुंदरलाल आता दयाला जेठालालकडे परत आणण्यास तयार आहे.

या बातमीने जेठालाल, बापूजी आणि टप्पू सगळे आनंदाने भरून आले. या आनंदात गोकुळधाम सोसायटीचे सदस्यही सहभागी झाले असून त्यांनी दया परतीच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. मात्र, तारक मेहता जरा चिंतेत आहे. सुंदर लाल इथेही काही फसवणूक करेल असे त्यांना वाटते.

याआधी शैलेश लोढा आणि जेनिफर मिस्त्री यांनी देखील या शोला अलविदा म्हटले आहे. त्यांनी हा शो सोडल्यापासून वेगवेगळ्या आरोपांमुळे शो चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत अनेक स्टार्सनी या शोचा निरोप घेतला आहे. टप्पूची भूमिका करणारा राज अनडकट याने शो सोडला आहे.

चाहत्यांना दयाबेनच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. सप्टेंबर 2017 मध्ये, ती प्रसूती रजेवर गेली आणि परत आली नाही. मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, असित कुमार मोदी यांनी एक मोठी घोषणा केली होती, ज्यामध्ये ते म्हणाले होते की, तो लवकरच चाहत्यांची आवडती दिशा वकानी उर्फ ​​दयाबेनला परत आणणार आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत