AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवं वळण; जयश्रीच्या दबावाला काय असेल वसु-आकाशचं उत्तर

Punha Kartvya Ahe Serial New Turn : 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील पात्र लोकांना आपलीशी वाटत आहेत. वसुंधरा आणि आकाशचं नातंही प्रेक्षकांना आवडतं आहे. आता ही मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. वाचा सविस्तर...

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवं वळण; जयश्रीच्या दबावाला काय असेल वसु-आकाशचं उत्तर
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवं वळणImage Credit source: tv9
| Updated on: Jul 27, 2024 | 3:10 PM
Share

‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. आकाश आणि वसुंधराचं नातं आता अधिक घट्ट होत आहे. अशात आता ही मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत बनीला त्रास देण्यासाठी जयश्रीचे प्रयत्न सुरूच आहेत. पण आता त्याची तीव्रता ती वाढवते आहे. ज्यामुळे तो लवकरात लवकर बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय घेईल. जयश्रीच्या प्रयत्नानंना यश मिळत आणि बनी आपला निर्णय सगळ्यांना सांगतो. इकडे लकीला कळलं आहे की तो ज्या वृद्ध जोडप्याला मदत करत आहे ते त्याचे स्वतःचे आई- वडील आहेत.

सुधीर आणि सुशीलाचा वसुंधराचं लग्न आणि बनीचे अस्तित्व लकीपासून लपवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. निराश बनी वसु-आकाश समोर आपली बोर्डिंग स्कूलमध्ये इच्छा बोलून दाखवतो. आकाश आणि वसुला याबद्दल शंका वाटते पण बनी त्यांना पटवून देतो. बनीचा बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याचा दिवस उजाडतो. आकाश, वसु सोबत बनीला सोडायला जाणारच आहे. तितक्यातच जयश्री काहीतरी घोळ घालते. ज्यामुळे आकाशला मागे राहणं भाग पडतं.

वसु-आकाशचं उत्तर काय?

घरात बनीच्या अनुपस्थितीचा सामना करण्यासाठी वसुचा संघर्ष सुरु होतो. पहिल्यांदाच आपल्या मुलापासून वसु इतकी दूर राहत असल्यानी तिचा जीव कासावीस होतो. पण जयश्रीला विजयी झाल्यासारखे वाटते आणि ती वसुला ठाकूर घराण्याचा वारस देण्यासाठी दबाव आणायला सुरुवात करते. आता या सगळ्यावर वसुचं पुढचं पाऊल काय असेल? जयश्रीच्या दाबावाखाली येऊन वसु, आकाशसमोर आपलं दुःख व्यक्त करेल का? जयश्रीच्या हट्टाला वसुंधरा आणि आकाश यांचं उत्तर असेल? बोर्डिंग स्कूलमध्ये बनीचे काय अवस्था होत आहे? हे आता येत्या काळात ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत पाहायला मिळेल.

नवीन प्रोमोत काय?

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात वसुंधरा तिच्या आई- बाबांना फोन करते आहे. त्यावेळी मला वाईट वाटेल म्हणून कोणती गोष्ट लपवू नका, असं वसुंधरा आई- बाबांना सांगते. मात्र तितक्यात मागून तिला शार्दुलचा आवाज येतो आहे. वसुंधरासमोर शार्दुलचं सत्य येणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.