बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करता दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण…

Bollywood Actress Life: आयुष्यात नवरी झाली नाही, सप्तपदी देखील घेतल्या नाहीत, तरीही 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या आयुष्याची चर्चा...

बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करता दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण...
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 2:40 PM

Bollywood Actress Life: झगमगत्या विश्वातील काही रहस्य समोर आल्यानंतर धक्का बसतो. आता देखील अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने लग्न झालेलं नसताना दिग्दर्शकाची पत्नी म्हणून संपूर्ण आयुष्य घालावलं. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. पण लग्नाआधीच अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचं निधन झालं. बॉयफ्रेंडच्या निधनानंतर अभिनेत्री कधीच दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. अभिनेत्रीने पांढऱ्या साडीमध्ये स्वतःचं आयुष्य घालवलं…

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नंदा कर्नाटकी आहे. नंदा यांनी 3 दशक म्हणजे तब्बल 30 वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी नंदा यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. तरुण वयातच नंदा यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी झगमगत्या दुनियेत पाऊल टाकावं लागलं. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मंदिर’ या सिनेमातून नंदा यांनी बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात केली.

त्यानंतर 1956 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुफान और दिया’ सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं. त्यानंतर नंदा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाह. बॉलिवूडला दमदार सिनेमे देत नंदा यशाच्या शिखरावर चढल्या. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना त्यांच्या आयुष्यात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांची एन्ट्री झाली.

हे सुद्धा वाचा

मनमोहन देसाई यांना अभिनेत्री नंदा कर्नाटकी यांच्यावर खूप प्रेम होतं, पण ते कधीही उघडपणे प्रेम व्यक्त करू शकले नाहीत. बॉलिवूडमध्ये गजलेला एक किस्सा सांगायचा झाला तर, मनमोहन देसाई यांनी जीवन प्रभा यांच्यासोबत लग्न केलं. त्यामागे देखील एक कारण होतं. जीवन प्रभा या नंदा यांच्यासारख्या दिसायच्या म्हणून… पण यामध्ये तथ्य किती आहे… याची काही कल्पना नाही.

दरम्यान, काही दिवसांनंतर मनमोहन यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर मनमोहन आणि नंदा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. यावेळी दोघांनीही आपलं नातं पूर्ण करायचं ठरवलं आणि साखरपुडा केला. साखरपुड्याच्या अवघ्या दोन वर्षांनी मनमोहन देसाई यांचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला, त्यानंतर नंदा यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.

मनमोहन देसाई यांच्या निधनानंतर नंदा यांनी कधीच दुसऱ्या पुरुषाचा विचार केला नाही. आयुष्यभर त्यांनी विधवा म्हणून राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आयुष्यभर एकटे राहणाऱ्या कर्नाटकातील नंदा यांनी 20214 साली जगाचा कायमचा निरोप घेतला.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.