AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करता दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण…

Bollywood Actress Life: आयुष्यात नवरी झाली नाही, सप्तपदी देखील घेतल्या नाहीत, तरीही 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या आयुष्याची चर्चा...

बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करता दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण...
| Updated on: Dec 08, 2024 | 2:40 PM
Share

Bollywood Actress Life: झगमगत्या विश्वातील काही रहस्य समोर आल्यानंतर धक्का बसतो. आता देखील अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने लग्न झालेलं नसताना दिग्दर्शकाची पत्नी म्हणून संपूर्ण आयुष्य घालावलं. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. पण लग्नाआधीच अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचं निधन झालं. बॉयफ्रेंडच्या निधनानंतर अभिनेत्री कधीच दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. अभिनेत्रीने पांढऱ्या साडीमध्ये स्वतःचं आयुष्य घालवलं…

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नंदा कर्नाटकी आहे. नंदा यांनी 3 दशक म्हणजे तब्बल 30 वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी नंदा यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. तरुण वयातच नंदा यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी झगमगत्या दुनियेत पाऊल टाकावं लागलं. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मंदिर’ या सिनेमातून नंदा यांनी बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात केली.

त्यानंतर 1956 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुफान और दिया’ सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं. त्यानंतर नंदा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाह. बॉलिवूडला दमदार सिनेमे देत नंदा यशाच्या शिखरावर चढल्या. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना त्यांच्या आयुष्यात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांची एन्ट्री झाली.

मनमोहन देसाई यांना अभिनेत्री नंदा कर्नाटकी यांच्यावर खूप प्रेम होतं, पण ते कधीही उघडपणे प्रेम व्यक्त करू शकले नाहीत. बॉलिवूडमध्ये गजलेला एक किस्सा सांगायचा झाला तर, मनमोहन देसाई यांनी जीवन प्रभा यांच्यासोबत लग्न केलं. त्यामागे देखील एक कारण होतं. जीवन प्रभा या नंदा यांच्यासारख्या दिसायच्या म्हणून… पण यामध्ये तथ्य किती आहे… याची काही कल्पना नाही.

दरम्यान, काही दिवसांनंतर मनमोहन यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर मनमोहन आणि नंदा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. यावेळी दोघांनीही आपलं नातं पूर्ण करायचं ठरवलं आणि साखरपुडा केला. साखरपुड्याच्या अवघ्या दोन वर्षांनी मनमोहन देसाई यांचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला, त्यानंतर नंदा यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.

मनमोहन देसाई यांच्या निधनानंतर नंदा यांनी कधीच दुसऱ्या पुरुषाचा विचार केला नाही. आयुष्यभर त्यांनी विधवा म्हणून राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आयुष्यभर एकटे राहणाऱ्या कर्नाटकातील नंदा यांनी 20214 साली जगाचा कायमचा निरोप घेतला.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...