AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडने सांगितला आयुष्यातील ‘तो’ वाईट काळ;म्हणाला “मी डिप्रेशनमध्ये होतो…”

ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडने नुकताच खुलासा केला आहे.की त्याला आता इंडस्ट्रीची भिती वाटत आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील काही कटू आठवणींबद्दल आणि अनुभवाबद्ल सांगितलं आहे.

ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडने सांगितला आयुष्यातील 'तो' वाईट काळ;म्हणाला मी डिप्रेशनमध्ये होतो...
| Updated on: Dec 04, 2024 | 5:59 PM
Share

ऐश्वर्या रायचे नाव तसे बऱ्याच कलाकारांबरोबर जोडले गेले होते.पण त्यातील एक कलाकार ज्याचे करिअरच जवळपास संपले होते. तो म्हणजे ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉय. एका मुलाखतीत विवेकने त्याच्या करिअरमध्ये आलेला तो वाईट काळ सांगितला. त्यामुळे आता त्याला चित्रपटसृष्टीचीच भिती वाटत असल्याचे म्हटले आहे.

हा अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय. विवेक ओबेरॉयच्या अभिनयाबद्दल लोकांनी अनेकदा कौतुक केलं आहे. पण त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची हवी तशी आणि तितकी संधी मिळाली नाही. एका पॉडकास्ट दरम्यान, त्याला काम मिळत नसल्याने आलेल्या डिप्रेशनबद्दल सांगितले होते.

विवेक ओबेरॉयचे म्हणणे आहे की, फिल्म इंडस्ट्री खूपच असुरक्षित आहे. 2007 मध्ये त्याला त्याच्या एका चित्रपटासाठी पुरस्कार मिळूनसुद्धा हव्या तशा ऑफर्स येत नव्हत्या. जवळपास 15 महिने त्याच्याकडे काम नसल्याचं त्याने सांगितले. अखेर त्याने काहीतरी व्यवसाय करायचं ठरवल्याचे त्याने सांगितले.

फिल्म इंडस्ट्री असुरक्षित

एका मुलाखतीत विवेक म्हणाला, “मी 22 वर्षात जवळपास 67 प्रोजेक्ट केले आहेत पण तरीही हे म्हणावसं वाटतं की, इंडस्ट्री खूप असुरक्षित आहे. तुम्ही चांगली कामगिरी करत आहात, पुरस्कार जिंकत आहात आणि एक अभिनेता म्हणून तुमचे कौतुकही होत आहे,मात्र त्याच वेळी तुम्हाला इतर काही कारणांमुळे काम मिळणे बंद होते.

“15 महिने काम नव्हते, डिप्रेशनमध्ये होतो.”

पुढे विवेक म्हणाला, ‘मी 2007 मध्ये लोखंडवाला चित्रपट शूट केला तेव्हा ‘गणपत’ हे गाणे व्हायरल झालं होतं. त्यानंतर मला बऱ्याच ऑफर्सची अपेक्षा होती, पण मला काहीच मिळाले नाही.

चित्रपटाच्या यशानंतर मी 14 ते 15 महिने घरी बसलो. मला अनेक गोष्टींची काळजी वाटत होती. मी खूप तणावात होतो” असं म्हणत त्याने त्याच्या करिअरचा तो वाईट काळ सांगितला.

विवेकने सांगितले की व्यवसाय हा नेहमीच त्याच्यासाठी प्लॅन बी होता. “सिनेमा ही माझी आवड असेल आणि मी व्यवसायातून माझा उदरनिर्वाह करेन, असं मी ठरवले. यामुळे मला स्वातंत्र्य मिळालं आणि मी लॉबीच्या जाळ्यातून बाहेरही आलो. माझा आत्मा विकणे किंवा कोणाची खुशामत करणे हे माझ्यासाठी जगण्याचा मार्ग नव्हता. काही लोक यातून उपजीविका करतात पण मी नाही.’ असं म्हणतं काम मिळण्यासाठी कोणाची विनवी करण्यापेक्षा व्यवसाय करणे पसंत असल्याचे विवेकने म्हटलं.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.