AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडने सांगितला आयुष्यातील ‘तो’ वाईट काळ;म्हणाला “मी डिप्रेशनमध्ये होतो…”

ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडने नुकताच खुलासा केला आहे.की त्याला आता इंडस्ट्रीची भिती वाटत आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील काही कटू आठवणींबद्दल आणि अनुभवाबद्ल सांगितलं आहे.

ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडने सांगितला आयुष्यातील 'तो' वाईट काळ;म्हणाला मी डिप्रेशनमध्ये होतो...
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 04, 2024 | 5:59 PM
Share

ऐश्वर्या रायचे नाव तसे बऱ्याच कलाकारांबरोबर जोडले गेले होते.पण त्यातील एक कलाकार ज्याचे करिअरच जवळपास संपले होते. तो म्हणजे ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉय. एका मुलाखतीत विवेकने त्याच्या करिअरमध्ये आलेला तो वाईट काळ सांगितला. त्यामुळे आता त्याला चित्रपटसृष्टीचीच भिती वाटत असल्याचे म्हटले आहे.

हा अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय. विवेक ओबेरॉयच्या अभिनयाबद्दल लोकांनी अनेकदा कौतुक केलं आहे. पण त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची हवी तशी आणि तितकी संधी मिळाली नाही. एका पॉडकास्ट दरम्यान, त्याला काम मिळत नसल्याने आलेल्या डिप्रेशनबद्दल सांगितले होते.

विवेक ओबेरॉयचे म्हणणे आहे की, फिल्म इंडस्ट्री खूपच असुरक्षित आहे. 2007 मध्ये त्याला त्याच्या एका चित्रपटासाठी पुरस्कार मिळूनसुद्धा हव्या तशा ऑफर्स येत नव्हत्या. जवळपास 15 महिने त्याच्याकडे काम नसल्याचं त्याने सांगितले. अखेर त्याने काहीतरी व्यवसाय करायचं ठरवल्याचे त्याने सांगितले.

फिल्म इंडस्ट्री असुरक्षित

एका मुलाखतीत विवेक म्हणाला, “मी 22 वर्षात जवळपास 67 प्रोजेक्ट केले आहेत पण तरीही हे म्हणावसं वाटतं की, इंडस्ट्री खूप असुरक्षित आहे. तुम्ही चांगली कामगिरी करत आहात, पुरस्कार जिंकत आहात आणि एक अभिनेता म्हणून तुमचे कौतुकही होत आहे,मात्र त्याच वेळी तुम्हाला इतर काही कारणांमुळे काम मिळणे बंद होते.

“15 महिने काम नव्हते, डिप्रेशनमध्ये होतो.”

पुढे विवेक म्हणाला, ‘मी 2007 मध्ये लोखंडवाला चित्रपट शूट केला तेव्हा ‘गणपत’ हे गाणे व्हायरल झालं होतं. त्यानंतर मला बऱ्याच ऑफर्सची अपेक्षा होती, पण मला काहीच मिळाले नाही.

चित्रपटाच्या यशानंतर मी 14 ते 15 महिने घरी बसलो. मला अनेक गोष्टींची काळजी वाटत होती. मी खूप तणावात होतो” असं म्हणत त्याने त्याच्या करिअरचा तो वाईट काळ सांगितला.

विवेकने सांगितले की व्यवसाय हा नेहमीच त्याच्यासाठी प्लॅन बी होता. “सिनेमा ही माझी आवड असेल आणि मी व्यवसायातून माझा उदरनिर्वाह करेन, असं मी ठरवले. यामुळे मला स्वातंत्र्य मिळालं आणि मी लॉबीच्या जाळ्यातून बाहेरही आलो. माझा आत्मा विकणे किंवा कोणाची खुशामत करणे हे माझ्यासाठी जगण्याचा मार्ग नव्हता. काही लोक यातून उपजीविका करतात पण मी नाही.’ असं म्हणतं काम मिळण्यासाठी कोणाची विनवी करण्यापेक्षा व्यवसाय करणे पसंत असल्याचे विवेकने म्हटलं.

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!