AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2023 : नवरात्रीत का प्रज्वलित केली जाते अखंड ज्योत? हे नियम पाळणे आहे आवश्यक

नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो. असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो.

Navratri 2023 : नवरात्रीत का प्रज्वलित केली जाते अखंड ज्योत?  हे नियम पाळणे आहे आवश्यक
अखंड ज्योत Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 14, 2023 | 6:16 PM
Share

मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि 9 दिवस अखंड ज्योती पेटवली जाते. नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसांत अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्री 23 ऑक्टोबरला संपणार असून 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. त्याच्या दूसऱ्या दिवशी दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या वर्षी नवरात्रीच्या काळात  दुर्गा देवीचे हत्तीवर बसून आगमन होत आहे, जे अत्यंत शुभ आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत देवीसमोर अखंड ज्योती का लावली जाते.

अखंड ज्योत लावण्यामागचे कारण

नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो. असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते. दिवा विझू नये म्हणून त्यात तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तसेच, वाऱ्याने दिवा विझू नये, यासाठी त्याभोवती काचेचे कवच ठेवले जाते.

अखंड ज्योतीचे नियम

  • नवरात्रीत अखंड ज्योती लावत असाल तर काही नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा चुका केल्यास केल्यास देवी नाराज होऊ शकते.
  •  नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा पहिला नियम म्हणजे घरात कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे, त्यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते. अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकामे ठेवू नका.
  • अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नका, ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरा.
  • पाटावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा पसरवा. जर तुम्ही कलशाच्या वर ज्योत लावत असाल तर खाली गहू ठेवा.
  • अखंड ज्योती दिव्यात पांठऱ्या वातीऐवजी लाल रंगाची वात वापरावी.
  • तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी. दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे.
  • अखंड ज्योती वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे, तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी गणेशाची,  दुर्गा देवीची पूजा करावी. दुर्गा मंत्राचा जप करावा. मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिव धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.