AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-China Face Off | लडाखमध्ये 3 इन्फन्ट्री तैनात, हिमाचलमध्येही अतिरिक्त तुकडी, चिनी संघर्षानंतर सीमेवर भारताचे किती सैन्य?

उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊ सेक्टरमध्ये सैन्य दल वाढवण्यात आले आहे. उत्तरकाशीच्या चिन्यालिसौरमध्ये हवाईदलाने धावपट्टी सक्रिय केली आहे.

India-China Face Off | लडाखमध्ये 3 इन्फन्ट्री तैनात, हिमाचलमध्येही अतिरिक्त तुकडी, चिनी संघर्षानंतर सीमेवर भारताचे किती सैन्य?
भारत-चीन सीमावाद
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jun 18, 2020 | 4:20 PM
Share

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात शांतता कराराचा (Indian Army Prepare At LAC) भंग केल्यानंतर आता भारताने चीनला धडा शिकवण्याची तयारी केली आहे. लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) अतिरिक्त जवान तैनात करण्यापासून ते हिंद महासागरात नौदलाचा ताफा वाढवण्यात आला आहे. पाणी, जमीन आणि आकाशात ज्याप्रकारे भारताने आपली शक्ती प्रस्थापित केली आहे, त्याला भेदणं चीनसाठी सोपं (Indian Army Prepare At LAC) नसेल.

भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्य चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. चीनचा पूर्वइतिहास पाहता भारत सतर्क आहे. लडाखमध्ये 3 इन्फन्ट्री डिव्हिजन तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय, उंचीवर युद्धाभ्यास करणाऱ्या दोन ब्रिगेड देखील तैनात आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये अतिरिक्त सैन्य पाठविण्यात आले आहे.

उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊ सेक्टरमध्ये सैन्य दल वाढवण्यात आले आहे. उत्तरकाशीच्या चिन्यालिसौरमध्ये हवाईदलाने धावपट्टी सक्रीय केली आहे. सिक्किममध्येही सैन्य दल वाढवण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेशातही भारताने पूर्ण व्यवस्था केली आहे.

जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचलमध्ये उत्तरी लष्कराच्या कमांडमध्ये 34,000 भारतीय सैनिक तैनात आहेत. उत्तराखंडमध्ये केंद्रीय लष्कराच्या कमांडमध्ये 15,500 सैनिक तैनात आहेत. सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि बंगालमध्ये पूर्व लष्कराच्या कमांडमध्ये 1 लाख 75 हजार 500 सैनिक तैनात आहेत. याप्रमाणे भारतीय सीमेवर सध्या 2 लाख 25 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत (Indian Army Prepare At LAC).

सुकना येथे 33 कोअर, तेजपूरमध्ये 4 कोअर, रांचीमध्ये 17 माउंटन स्ट्राइक कोअर तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय, वायू सेनेकडून एलएसीला लागून असलेल्या तळांवर लढाऊ विमानांना तैनात करण्यात आलं आहे. त्यासोबतच भारताने हिंद महासागरात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच पाणी, जमीन आणि आकाशात भारत तयार आहे.

भारताकडे जास्त अनुभवी सैन्य

यादरम्यान, चीनचे संरक्षण तज्ज्ञ आणि लष्करी चिनी मासिक मॉडर्न वॅपनेरीचे संपादक हुआंग गुओझी यांनी लिहिले, ‘डोंगराळ प्रदेश आणि पर्वतीय भागातील सर्वात अनुभवी सैन्य फक्त भारताकडे आहे.. 12 विभागांमधील 2 लाख सैनिकांसह भारत हा जगातील सर्वात शक्तिशाली पर्वतीय लढाऊ दल आहे.’

हार्वर्ड कॅनेडी शाळेच्या वेलफेअर सेंटर फॉर सायंस अ‍ॅण्ड इंटरनॅशनल अफेअर्सच्या रिसर्चमध्ये म्हटलं, ‘युद्ध झाल्यास उत्तर सीमेवर भारत चीनवर भारी पडू शकतो ‘ (Indian Army Prepare At LAC).

संबंधित बातम्या :

Boycott Chinese Equipment : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं

India-China Face Off | भारताकडे सुखोई, अपाचे बोईंग, तर चीनकडे चेंगडू जे-20 आणि wz-10, कुणाकडे किती शस्त्रसाठा?

PM Modi on Ladakh face-off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी