AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाक वारंवार बंद होतंय? वास येत नाही? असू शकते १०० हून अधिक आजारांचे लक्षण

बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल तर हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या.कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते.

नाक वारंवार बंद होतंय? वास येत नाही? असू शकते १०० हून अधिक आजारांचे लक्षण
| Updated on: Nov 12, 2024 | 2:22 PM
Share

नाक बंद असताना कोणत्याही गोष्टीचा वास न येणे हे एक सामान्य लक्षण आहे. पण दीर्घकाळ वास न येणे हे धोकादायक ठरू शकते. शंभराहून अधिक रोगांचे प्रारंभिक लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वास न येणे. त्यामुळे जर तुम्हाला ही बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते. अनेकदा काही विशिष्ट आजारामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवत नाही. थंडीत नाक बंद होण्यापासून ते कोविडमध्ये लोकांना काहीही वास न येण्यापर्यंत अशी लक्षणेही आपण पाहिली आहेत.

कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवणे ही आपल्या पाच इंदिरांपैकी एक आहे जे आपल्याला लहानपणापासूनच मिळते परंतु काही आजारांमुळे आपली ही भावना काम करणे थांबून जाते. त्यामुळे आपली कोणत्याही गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, 139 वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यामध्ये कोणताही वास घेण्याची आपली क्षमता नष्ट होते.

संशोधन काय सांगते?

चार्ली डनलॉप स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्सेसच्या संशोधकांनी, द ऑक्सफर्ड रिसर्च सेंटर इन द ह्युमॅनिटीच्या सहकार्याने असे संशोधन केले आहे, ज्यामध्ये अशा प्रकारच्या 139 वैद्यकीय परिस्थितीचा मानवी वास घेण्याच्या क्षमतेशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे रुग्ण कोणत्याही प्रकारची दुर्गंधीचा वास घेऊ शकत नाही. हे लक्षण अगदी सामान्य मानले जात असले तरी देखील हे विविध न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक रोगांचे प्रारंभिक लक्षण असू शकते. त्याचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या स्मरणशक्तीशीही असल्याचा आढळून आले आहे.

कोणत्या रोगांशी संबंध?

अलझायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजारांशी देखील संबंध आहे . कोरोना व्हायरस आणि सायनुसायटीस सारख्या प्रमुख आजारांशी देखील याचा संबंध आहे. या संशोधनानुसार जर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा वास न आल्यासारखी लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे आजारांची प्रारंभिक लक्षणे असू शकतात.ज्याद्वारे रुग्णांवर उपचार करता येवू शकतात.वेळीच उपचार घेतले तर आजार वाढण्यापासून रोखणे देखील शक्य होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.