AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health hot water : रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य

बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे खरंच फायदेशीर आहे का, त्यामागचे नेमके कारण काय आहे, जाणून घेऊया.

Health hot water : रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य
रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Sep 01, 2022 | 3:58 PM
Share

Weight Loss : व्यस्त जीवनशैली, धावपळीचे जीवन, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, पौष्टिक आहार न घेणं यामुळे आजकाल अनेक लोकांचे वजन वाढलेले दिसते. हे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. कोणी स्पेशल डाएट (Diet) करतात, तर काहीजण व्यायाम, योगासने असे बरेच उपाय करतात. काहींना यश मिळतं तर काहींना वेळ लागतो. बरेच जण वजन कमी करण्यासाठी सकाळी उठून गरम पाणी पितात. मात्र खरंच गरम पाणी (Warm Water) प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा एक मोठा भाग असतो, मात्र ते नेमकं कसं होतं , रोज किती पाणी प्यावे, या सर्वांबद्दल माहिती जाणून घेऊया.

गरम पाणी पिऊन वजन कमी होते का ?

गरम पाणी पिण्याचे जसे काही फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच जेवल्यानंतर गरम पाणी अथवा कोमट पाणी प्यायल्यास अन्नपचनास मदत मिळते. मात्र त्यामुळे शरीराच्या वजनावर सरळ प्रभाव पडत नाही. मात्र, एका ठराविक प्रमाणात पाणी प्यायल्यास वजनावर परिणाम होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर तुमचे वजन कमी होऊ शकते. त्याशिवाय, जेवण्याआधी काही वेळ अर्धा लिटर पाणी प्यायल्यास मेटाबॉलिज्मही वाढते. दिवसभर थोड्या -थोड्या वेळाने गरम पाणी पीत राहिल्यास मेटाबॉलिज्म सुधारते, फॅट ब्रेक करण्यासाठी गरम पाण्याची मदत होते. त्यामुळे पचनही चांगल्या पद्धतीने होते आणि पाणी पीत राहिल्याने सारखी-सारखी भूकही लागत नाही.

हे उपाय येतील कामी

  1. वजन कमी करायचे असेल तर गरम पाणी पिण्यासोबतच आणखीही काही उपाय केल्यास त्याचाही फायदा होऊ शकेल.
  2. तुम्ही सकाळी हर्बल टी (Herbal Tea) पिऊ शकता. हर्बल टी, वजन कमी करण्याचे काम करते आणि त्यामुळे शरीरही डिटॉक्स होते.
  3. सकाळी असा नाश्ता करावा जो तुम्हाला दिवसाची चांगली सुरूवात करण्यासाठी भरपूर उर्जा देईल. तसेचे दिवसभरात कोणतेही जेवण टाळू नका.
  4. भरपूर प्रमाणात फळं आणि सुका-मेवा खात रहा. दोन जेवणांच्या दरम्यान छोटी -छोटी भूक लागते तेव्हा स्नॅक्स म्हणून हे खाऊ शकता.
  5. थोड्याफार प्रमाणा व्यायाम करावा. त्याने शरीराचीही हालचाल होईल, फॅट कमी होताना दिसेल व तुमचा फायदा होईल.
Follow Us
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?