AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | मधुमेह नियंत्रित करण्यासाठी या गोष्टी दुधात मिसळून प्या आणि निरोगी जीवन जगा!

औषधी गुणधर्म असलेली हळद प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरली जाते. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हळदीमध्ये रोगाचा धोका कमी करण्याची क्षमता असते.

Health | मधुमेह नियंत्रित करण्यासाठी या गोष्टी दुधात मिसळून प्या आणि निरोगी जीवन जगा!
Image Credit source: TV9
| Updated on: May 01, 2022 | 1:49 PM
Share

मुंबई : मधुमेह (Diabetes) हा अशा आजारांपैकी एक आहे, जो माणसाच्या डोक्याचा ताण चांगलाच वाढवतो. विशेष म्हणजे नुकताच झालेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की, जवळपास 90 टक्के लोकांना मधुमेह कधीपासून झाला आहे हे माहीत होत नाही. मधुमेह होण्यामागे अनेक कारणे देखील आहेत. त्यात प्रामुख्याने चुकीचे खाणे, चुकीची जीवनशैली (Lifestyle) आणि अनुवांशिक कारणे देखील आहेत. याचा शरीरावर दोन प्रकारे परिणाम होतो, काही लोकांच्या रक्तातील साखर जास्त राहते, तर काहींची कमी होते. बहुतेक प्रकरणांमध्ये रक्तातील साखरेची (Blood sugar) पातळी वाढल्याने समस्या निर्माण होतात. मधुमेहामुळे शरीरात इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये अडचण येते, भूक न लागणे, जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे यासारखे बदल शरीरामध्ये प्रामुख्याने जाणवतात.

दालचिनी

छोटीशी दालचिनी देखील मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. किचनमध्ये नेहमी असणारी दालचिनी आरोग्यासाठी चांगली मानली जाते. मसाल्याच्या रूपात जेवणाची चव वाढवणाऱ्या दालचिनीमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही दररोज दुधात दालचिनी पावडर टाकून पिऊ शकता. यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास नक्कीच मदत होते.

हळद

औषधी गुणधर्म असलेली हळद प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरली जाते. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हळदीमध्ये रोगाचा धोका कमी करण्याची क्षमता असते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ती प्रभावी मानली जाते. केवळ मधुमेही रुग्णच नाही तर निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे.

बदाम

बदामाचे नियमित सेवन केल्याने अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात. विशेष म्हणजे सोडियमचे प्रमाण कमी असल्याने उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर मानले जाते, दररोज बदामाचे दूध प्यावे. यासोबतच 6 ते 7 भिजवलेले बदामही सकाळी खावेत. तसेच बदाम फक्त मधुमेहावर नियंत्रणच ठेवत नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी आणि विशेष करून आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. जर आपल्याला कायमच निरोगी राहिचे असेल तर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी बदामाचे सेवन नक्कीच करायला हवे.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?