AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चार कारणांमुळे कमी वयात जडतोय कॅन्सरचा आजार, तुम्हीही राहा सतर्क

कर्करोगाचे वाढते प्रमाण हे भारतासमोर आव्हान ठरत आहे. यामागे मुख्यतः चार कारण सांगितले जाते. जाणून घेऊया

या चार कारणांमुळे कमी वयात जडतोय कॅन्सरचा आजार, तुम्हीही राहा सतर्क
फुफ्फुसाचा कर्करोग Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 13, 2022 | 6:47 AM
Share

मुंबई,  जगभरात कर्करोगाच्या (Cancer) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, गेल्या 10 वर्षांत भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात कर्करोगाने ग्रस्त 10 पैकी 6 लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. ICMR ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पुढील पाच वर्षांत देशातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 12 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. लहान वयातही या आजाराची प्रकरणे समोर येत आहेत, ही चिंतेची बाब आहे. या प्राणघातक आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची चार प्रमुख कारणे आहेत.

नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की,  लहान वयात कर्करोग होण्याची चार मुख्य कारणे आहेत. यातील पहिली वाईट जीवनशैली आहे. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे प्रोस्टेट कॅन्सर, थायरॉईड कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. वेळेवर झोप न लागण्याची सवय आणि जीवनशैलीत सक्रियता नसल्यामुळे हा आजार वाढत आहे. लोकांच्या जीवनात मानसिक तणावही खूप वाढला आहे. आता 30 ते 50 या वयोगटातही कॅन्सरचे रुग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे, तर काही दशकांपूर्वीपर्यंत हा आजार वृद्धांमध्ये जास्त दिसून येत होता.

चुकीच्या खाण्याच्या सवयी

कर्करोगाचे प्रमाण वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे चुकीचा आहार. फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ यांच्या वाढत्या ट्रेंडमुळे कॅन्सर होत आहे. जास्त मांस आणि प्लॅस्टिक बंद पदार्थ खाल्ल्याने किंवा पाणी प्यायल्यानेही हा आजार वाढत आहे, कारण प्लास्टिकमध्ये घातक रसायने असतात जी आपल्या आत जाऊन कर्करोगाला कारणीभूत ठरतात.

 लठ्ठपणाचे वाढते प्रमाण

कर्करोगाचे तिसरे प्रमुख कारण म्हणजे वाढते लठ्ठपणा. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. शरीराचा अतिरिक्त बीएमआय कर्करोगाला आमंत्रण देत आहे. अशा स्थितीत शरीर तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. बीएमआय वाढत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिवसातून किमान अर्धा तास काही तरी व्यायाम करायलाच हवा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

धूम्रपान आणि मद्यपान

सध्या तरुणांमध्ये धूम्रपान आणि दारूचे व्यसन खूप वाढले आहे. अनेक तरुणांनाही त्यांचे व्यसन लागले आहे. जास्त सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे. दारूमुळे यकृत आणि पोटाच्या कर्करोगाची प्रकरणे समोर येत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.