AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ 5 पदार्थ तूमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करतात, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. कारण जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच नेहमी डॉक्टर आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. तर हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणे पुरेसे नसते. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत जेणेकरून डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.

'हे' 5 पदार्थ तूमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करतात, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 7:14 PM
Share

बऱ्याचदा आपण आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही ज्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनची समस्या येते आणि नंतर चक्कर येणे आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. असे बहुतेकदा उन्हाळ्यात घडते जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असणे सामान्य आहे. तर यावेळी ज्येष्ठ वैद्य डॉ. कमलजीत सिंह कैंथ यांनी सांगितले की, उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातून पाणी बाहेर पडत राहते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका वाढतो. तुम्हाला माहिती आहे का की असे काही अन्नपदार्थ आहेत ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते? उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी तुम्ही कमी प्रमाणात खाव्यात किंवा प्याव्यात हे जाणून घ्या.

1. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ टाळावेत. कारण त्यात अतिरिक्त तेल असते ज्यामुळे वारंवार तहान लागते आणि मसालेदार पदार्थांमध्ये कॅप्सेसिन देखील असते जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते.

2. उन्हाळ्यात फास्ट फूडचे सेवन करू नये. बर्गर, समोसे आणि फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. कारण हे तेलकट पदार्थ असतात आणि त्यात मीठाचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढते.

3. उन्हाळ्यात तहान खूप लागत असते. तर अनेकजण तहान भागवण्यासाठी थंडगार कोल्ड्रिंक्स पित असतात. अशातच हे सॉफ्ट ड्रिंक्स शरीराला थंड करतात पण त्यात भरपूर साखर असते, ज्यामुळे ते प्यायल्यानंतरही तहान लागते आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.

4. ऋतू कोणताही असो बहुतेक लोकांना कॉफी प्यायला खूप आवडते कारण कॉफीच्या सेवनाने थकवा आणि आळस दूर करण्यास मदत होते. परंतु जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते आणि शरीराचे तापमान देखील वाढू शकते, ज्यामुळे अपचन देखील होऊ शकते.

5. आपल्या निरोगी आरोग्यासाठी जरी सुका मेवा खूप फायदेशीर असला तरी उन्हाळ्यात सुकामेवा खाणे टाळले पाहिजेत. कारण या सुकामेव्यांचा स्वरूपही उष्ण असतो ज्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

6. ग्रीन टी ला खूप चांगले आणि हेल्दी ड्रिंक म्हणतात. कारण यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात, परंतु तूम्हाला माहित आहे का की हे ग्रीन टी च्या अति सेवनाने आपले शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन कमी केले पाहिजे. कारण ते आपल्या शरीरातील पाणी शोषून घेते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?