
हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. पण त्या शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. बरेच लोक बाजारातून आणलेल्या पालेभाज्या थेट कापून शिजवतात. पण असे करणे ही एक मोठी चूक आहे. कारण काही हिरव्या भाज्या मातीत वाढतात. त्यामुळे त्यांना माती चिकटकलेली असते. त्या न धुता शिजवल्याने, त्यातील माती आणि अशुद्धी आपल्या शरीरात प्रवेश करून आजारपण आणू शकतात. जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे म्हणून, त्या कापण्यापूर्वी आणि शिजवण्यापूर्वी एक-दोन वेळा धुणे उत्तम.
पाने काढून टाका: जर तुम्ही पालेभाज्या स्वच्छ करत असाल तर, प्रथम हाताने पाने काढून घ्या. नंतर ती झटकून स्वच्छ करा. म्हणजे त्यावरील कीटक गळून पडतील. आता एका मोठ्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात पालेभाज्या थोड्या थोड्या करून टाका आणि धुवा. प्रथम अर्ध्या पालेभाज्या पाण्यात ३-४ वेळा धुवा. यामुळे त्यावरील धूळ आणि घाण पूर्णपणे निघून जाईल. मग त्या कापून शिजवा.
बेकिंग सोडा: जर तुम्हाला भाज्यांच्या पानांना चिकटलेले कीटक काढायचे असतील, तर एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. आता त्यात भाज्या घालून 15 मिनिटे तशाच ठेवा. त्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवा. कीटक सहज निघून जातील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही भाज्या व्हिनेगरच्या पाण्यातही भिजवून ठेवू शकता.
जाळीची पिशवी: जर तुम्हाला पालेभाज्या सहजपणे स्वच्छ करायच्या असतील, तर जाळीच्या पिशवीचा वापर करा. पालेभाज्या चिरून पिशवीत ठेवा. एका मोठ्या पातेल्यात किंवा बादलीत पाणी भरा आणि त्यात जाळीची पिशवी बुडवा. यामुळे पालेभाज्यांवरील सर्व धूळ, घाण आणि कीटक निघून जातील.
मिठाने धुवा: पालेभाज्या कापून मिठाच्या पाण्यात धुवा. यामुळे पानांना चिकटलेले कीटकही निघून जातील. पालेभाज्या धुण्यासाठी, तुमच्याकडे असलेले एक मोठे भांडे घ्या. तुम्ही कापलेल्या सर्व पालेभाज्या एकाच वेळी धुण्याऐवजी, त्यांचे 3 भाग करा आणि पाण्याने 2 – 3 वेळा धुवा. या सोप्या टिप्सचे पालन केल्याने, तुम्हाला त्यातील पोषक तत्वे तर मिळतीलच, शिवाय तुम्ही निरोगीही राहाल.