AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : थंडी जोर पकडतीये, आहारात या 5 भाजांचा करा समावेश

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात विटामिन ए मिळवण्यासाठी तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. तर आता आपण अशा पाच भाज्यांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या शरीराला विटामिन ए मिळण्यास मदत होईल आणि तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागणार नाही.

Health : थंडी जोर पकडतीये, आहारात या 5 भाजांचा करा समावेश
निरोगी आयुष्यासाठी, निरोगी हृदयासाठी हेल्दी फूड खूप गरजेचं आहे. हृदयविकारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर जंक फूड खाणं सोडा, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, साखर, रेड मीट आणि तळलेल्या गोष्टी खाऊ नका. हृदयाची काळजी घेण्यासाठी ताजी फळे, भाज्या, मासे यासारखे पदार्थ खायला हवीत.
| Updated on: Nov 03, 2023 | 7:38 PM
Share

मुंबई : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच निरोगी राहण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरात विटामिन ए असणे आवश्यक आहे. विटामिन ए असल्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. तसेच मुलांच्या योग्य विकासासाठी देखील विटामिन ए आवश्यक आहे. विटामिन ए मुळे आपली त्वचा निरोगी राहते. पण आपल्या शरीरात जर विटामिन ए ची कमतरता असेल तर एनीमिया, कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे अशा दिवसांमध्ये निरोगी राहणे खूप गरजेचे आहे.

टोमॅटो – टोमॅटो हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. टोमॅटो खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला विटामिन ए मिळण्यास मदत होते. तसेच टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात त्यामुळे टोमॅटो खाल्ल्यामुळे शरीरातील विटामिन ए ची कमतरता भरून काढते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच टोमॅटो खाल्ल्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

गाजर – गाजर हे खायला चविष्ट लागते. सोबतच ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर देखील ठरते. गाजरामध्ये विटामिन ए सर्वाधिक आढळते. जर तुम्ही दररोज एक वाटी गाजर खाल्ले तर तुमच्या शरीरातील ए जीवनसत्वाची 334% कमतरता भरून काढता येते. त्यामुळे तुम्ही गाजराची कोशिंबीर किंवा गाजराची भाजी म्हणून तुमच्या आहारात समावेश करू शकता.

रताळे – बहुतेक लोकांना रताळे खायला आवडते. तर याच रताळ्यामध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच लहान मुलांसाठी रताळे खूप फायदेशीर असते. त्यामुळे दररोज तुम्ही तुमच्या आहारात एक ते दोन रताळ्यांचे समावेश करणे आवश्यक आहे.

भोपळा – बहुतेक लोकांना भोपळा खायला आवडत नाही. पण हाच भोपळा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. भोपळ्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करतात. तसेच भोपळा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात विटामिन ए ची कमतरता भासत नाही. त्यामुळे भोपळा खाणं खूप गरजेचे आहे.

कोथिंबीर – तुम्ही तुमच्या आहारात कोथिंबीरचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. कारण कोथिंबीर खाल्ल्यामुळे शरीरात विटामिन ए ची कमतरता भासत नाही. तसेच कोथिंबीरमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे तुम्ही भाजीमध्ये किंवा भातामध्ये किंवा पराठ्यामध्ये कोथिंबिरीचा समावेश करू शकता

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.