AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात डायबिटीजचा वाढता धोका, 10 पैकी 4 रुग्ण आजारापासून अनभिज्ञ

भारतात १० पैकी ४ डायबिटीज रुग्णांना त्यांच्या आजाराची कल्पना नाही. एका नव्या अभ्यासात शहरात या आजाराचा धोका दुप्पट झाला आहे.

भारतात डायबिटीजचा वाढता धोका, 10 पैकी 4 रुग्ण आजारापासून अनभिज्ञ
Diabetes in India
| Updated on: Aug 14, 2025 | 5:14 PM
Share

आपल्या देशात अनेक आजारात शरीरात गुपचुप शिरकाव करीत हळूहळू तेथे बस्तान मांडत आपले आरोग्य संकटात आणत आहेत. डायबिटीज देखील त्यापैकी एक आहे. अनेक लोक यास गांभीर्याने घेत नाहीत. नंतर मोठी समस्या बनल्यानंतर त्याकडे त्यांचे लक्ष जाते. अलिकडेच लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका अभ्यासात आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. भारतातील १० पैकी ४ जणांना त्यांना डायबिटीज असल्याचे माहिती नसल्याचे उघडकीस आले आहे.

हा अभ्यास २०१७ ते २०१९ दरम्यान ४५ हून अधिक वयोगटाच्या व्यक्तींवर करण्यात आला.यात आढळले की या वयोगटातील २० टक्के लोक डायबिटीजने पीडीत आहे. पुरुष आणि महिला, दोघांमध्ये याचे प्रमाण जवळपास सारखे आहे. अभ्यासात हे देखील पुढे आले आहे की शहरी भागात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या ग्रामीण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. याचे कारण जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींची कमतरता मानले जात आहे.

भारतात डायबिटीजची गंभीर स्थिती

भारतात २० ते ७९ वयोगटातील व्यक्तींमध्ये डायबिटीजच्या रुग्णांची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.२०१९ मध्ये भारतात झालेल्या एकूण मृत्यूमध्ये सुमारे ३ टक्के मृत्यू डायबिटीजने झाले आहेत. याच बरोबर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. दोन्ही आजार जर वेळीच ओळखून नियंत्रित केले नाही तर ते हृदय, किडनी आणि डोळ्यांच्या गंभीर समस्येचे कारण बनू शकतात.

गावात उपचाराची अनुपलब्धता

अभ्यासात असे उघड झाले आहे की भारताच्या ग्रामीण क्षेत्रात डायबिटीज आणि हायब्लडप्रेशरच्या उपचाराची सुविधा खूपच कमजोर आहे. ICMR आणि WHO द्वारा सात राज्यांच्या १९ जिन्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात कळाले की केवळ ४० टक्के सब-सेंटर्स या आजारांवर उपचारासाठी तयार आहेत.

एक तृतीयांश केंद्रात डायबिटीजचे औषध मेटफॉर्मिन उपलब्ध नव्हते.

जवळपास अर्ध्या केंद्रांवर ( ४५ टक्के ) उच्च रक्तदाबावरील एम्लोडिपिन औषधांचा कमतरता

अटकाव आणि वेळीच निदान गरजेचे

डायबिटीज आणि हायब्लड प्रेशर दोन्ही असे आजार आहेत. ज्यात वेळेत निदान आणि योग्य औषध घेतले तरच तो नियंत्रणात येतो. सुरुवातीचे निदान, संतलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर औषधे घेतली तरच या आजारात होणाऱ्या गंभीर नुकसानाला रोखता येते.

Follow Us
पवनराजे निंबाळकर हत्येच्या केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर हत्येच्या केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?
7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार..
मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार....