AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ई….! दात न घासताच पाणी प्यायचं; हे योग्य की अयोग्य ? आरोग्याला असे काय मिळणार फायदे… वाचा बरं

आरोग्य तज्ञ नेहमी 8-10 ग्लास पाणी पिण्याची शिफारस करतात. पण ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर आहे की हानिकारक, ते जाणून घेऊया.

ई....!  दात न घासताच पाणी प्यायचं;  हे योग्य की अयोग्य ? आरोग्याला असे काय मिळणार फायदे... वाचा बरं
| Updated on: Mar 24, 2023 | 9:48 AM
Share

नवी दिल्ली : आपलं शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी 8-10 ग्लास पाणी पिणे (water drinking) फार महत्वाचे आहे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट (hydrated) तर राहतेच पण अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक अथवा टॉक्सिन्स (toxins) बाहेर पडण्यासही मदत होते. तसेच सकाळी ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. पण असे पाणी पिणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का ? काही लोकांना विचारण्यात आले की ब्रश न करता पाणी का प्यावे, तर त्यांनी उत्तर दिले की रात्री साधारण 7-8 तास पाणी शरीरात जात नाही, त्यामुळे सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यावे. हे खरंच योग्य आहे की नाही , ते आपणही जाणून घेऊया.d

अनेक आजार राहतात दूर

सकाळी उठल्यावर अनेकजण ब्रश न करता पाणी पितात. पण ते आरोग्यासाठी खूप जास्त होतं. सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे पोट नेहमीच चांगले राहते. गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही. यामुळे तुमचे अन्न पचन चांगले होते. ब्रश न करता पाणी प्यायल्यानेही अनेक आजार दूर राहतात.

इम्युनिटी वाढते

सकाळी दात न घासता पाणी प्यायलात तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव होतो. विशेषत: हिवाळ्यात, जर तुम्हाला खोकला, सर्दी आणि हंगामी आजारांची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता. ब्रश न करता पाणी प्यायल्यास त्याचा त्वचेवर आणि केसांवर चांगला परिणाम होतो.

हाय ब्लडप्रेशर आणि हाय शुगर नियंत्रित करते

सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि साखर नेहमी नियंत्रणात राहते. तसेच कोमट पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात राहते. याशिवाय लठ्ठपणाची समस्याही दूर राहते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.