मुंबईः समाजातील कोणताही पालक असो तो आपल्या बाळाच्या विकासासाठी (Child growth) सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतो. म्हणून बाळाला जरा काही झाले तरी बाळाच्या पालकांना काळजी (Parenting tips)वाटते. बाळाच्या आई-वडिलांना खूप काळजी असली आणि तरीही बाळाची वाढ योग्य पद्धतीने होत नाही असे अनेक प्रकरणांमधून दिसून आले आहे. त्यामुळे बाळाचा विकास योग्यरित्या होऊ शकला नाही, तर बाळ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत होण्याची शक्यता असते.
अशा काही समस्या असतील तर बालरोगतज्ज्ञांच्या (pediatrician) मते, यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात, त्यामध्ये अनुवांशिक, संसर्ग किंवा अन्नाची कमतरता अशा समस्यांचा समावेश असतो. या तज्ज्ञांच्या मते, बाळाच्या जन्मानंतर 3 वर्षांपर्यंतचा काळ हा त्याच्या वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. या काळात त्याचा योग्य विकास होऊ शकला नाही, तर त्याला दीर्घकाळ अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
बाळाच्या वाढीच्या विकासात विलंब झाला तर त्यावर उपचार करणे शक्य आहे, मात्र बाळ विकसित होऊ शकते नस
असे म्हटले जाते की विकासास विलंब झाला तर त्याचे उपचार शक्य आहेत, परंतु जर ते विकसित होऊ शकत नसेल तर त्यावर इलाज नाही. तसे, अशी अनेक कारणे आहेत, जे सूचित करतात की आपल्या बाळाचा विकास पाहिजे तसा होत नाही. आम्ही तुम्हाला या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
बऱ्याच वेळा, बाळाच्या विकासात अडचणी जाणवल्यास बाळालाकाही गोष्टी शिकण्यात अडचणी जाणवतात आणि त्याला काही गोष्टी शिकता येत नाहीत. त्याला खेळण्यात अडचण येत राहतात. किंवा त्याला काही कौशल्ये शिकण्यात अडचणी येतात. जशास तसे करता न येण, सुचनांचे पालन न करणे यासह अनेक गोष्टी त्याला करता येत नाहीत. जर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये या समस्या जाणवत असतील तर त्यावर त्वरित उपचार करा, त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. दुर्लक्ष केला तर वाईट परिणामाना सामोरे जावे लागणार आहे.
बाळ दर नैसर्गिकरित्या ते योग्य पाहत नसेल तर तेसुद्धा बाळाच्या विकसित होण्याची लक्षणे असू शकतात. बालरोगतज्ज्ञ ही गंभीर समस्या मानतात. काही वेळा बाळ सहा महिन्याचे झाले तरी त्याला नीट दिसू शकत नाही. काही तज्ज्ञ सांगतात की, बाळ जरी दोन महिन्याचे झाले तरी बाळ सामान्यतः हावभाव समजू शकते. बाळाच्या डोळ्यात पाणी येणे ही देखील गंभीर समस्या आहे. त्यामुळे बाळाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर तात्काळ बालरोग तज्ज्ञांनी भेट घेऊन उपचार चालू करा.
काही बाळांना खूप दिवस झाले तरी बोलता येत नाही. त्यामुळे ही गोष्टसुद्धा हेच सांगते त्याच्या विकासात काही तरी अडथळा जाणवतो आहे. याबरोबरच बोलताना जरी अडचणी येत असल्या तरी मुलाच्या आवाजा संबंधाबाबतही त्याला समस्या येऊ शकतात. त्यामुळे मुलाच्या विकासात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे बाळाच्या मेंदुला काही दुखापत झालेली असू शकते किंवा किंवा ऑटिझम असेल काही लहान मुलं पालकांच्या शब्दांना कोणताच प्रतिसाद देत नाहीत.
संबंधित बातम्या
शिवाजी पार्कमध्ये मनसेचा भव्य शिवजयंती सोहळा
Booked a Whole Train : अख्खी ट्रेन बुक करून तरुणांनी केली धम्माल, जयपूरमधला ‘हा’ Viral video पाहाच