पावसाळ्यात भरपूर अंडी खा, पण ही चूक करू नका! या 5 गोष्टी ठेवा लक्षात…

| Updated on: Jul 22, 2023 | 9:23 AM

जर आपण निष्काळजी असाल तर आपल्याला रुग्णालयात दाखल देखील करावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा 5 खबरदाऱ्या सांगणार आहोत, ज्या तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात घ्यायलाच हव्यात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी.

पावसाळ्यात भरपूर अंडी खा, पण ही चूक करू नका! या 5 गोष्टी ठेवा लक्षात...
5 monsoon tips
Follow us on

मुंबई: मान्सूनच्या आगमनाने कडक उन्हापासून आराम मिळतो, परंतु शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. अशा वेळी काही आवश्यक खबरदारी घेतली नाही तर आजारी पडायला वेळ लागत नाही. जर आपण निष्काळजी असाल तर आपल्याला रुग्णालयात दाखल देखील करावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा 5 खबरदाऱ्या सांगणार आहोत, ज्या तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात घ्यायलाच हव्यात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी.

पावसाळ्यात या 5 गोष्टी लक्षात ठेवा

आलं-लसूण आणि हळद खा

बरेच लोक लसूण खात नाहीत, परंतु त्यांना हे माहित असले पाहिजे की त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे व्हायरस, बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे होणारे आजार दूर होतात. हेच गुणधर्म हळद आणि आले मध्येही आढळतात, त्यामुळे त्यांचेही सेवन करावे.

भरपूर अंडी खा, पण ही चूक करू नका

अंडी सुपरफूड मानली जातात. यामध्ये अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. तुम्ही कोणत्याही ऋतूत अंडी खाऊ शकता. मात्र पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत अंडी कमी शिजवून किंवा कच्ची खाऊ नयेत. असे केल्याने तुम्ही फूड पॉयझनिंगला बळी पडू शकता.

स्ट्रीट फूड टाळा

रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या चाट किंवा इतर मसालेदार वस्तू खावीशी कुणालाही वाटू शकते. मात्र पावसाळ्यात ही इच्छा रुग्णालयापर्यंतही पोहोचू शकते. खरं तर आजकाल उघड्यावर विकले जाणारे अन्न बॅक्टेरिया आणि विषाणूंनी भरलेले असू शकते. त्यामुळे पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाणे टाळलेलेच बरे.

थंड पाण्याने आंघोळ

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणे चांगले मानले जाते. यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा निर्माण होतो. पण पावसाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. असे केल्याने फ्लूचा धोका वाढू शकतो. त्याऐवजी, आपण किंचित कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. असे केल्याने तुमचे शरीर निरोगी राहील.

शूज हवेशीर असावेत

पावसाळ्यात आर्द्रता खूप जास्त असते. ज्यामुळे आपल्याला खूप घाम येतो. या ऋतूत आपल्याला ताजी हवा मिळेल अशा पद्धतीने कपडे आणि शूज घालावेत. विशेषत: पायात हवेशीर शूज घालणे खूप महत्वाचे असते, म्हणजेच अशी चप्पल जी हवेशीर असेल, बंदिस्त नसेल. जर बंदिस्त चप्पल घातली पायात त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)