AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ कधीच एक्सपायर होत नाहीत…

आपण बाजारातून आणत असलेल्या जवळपास सर्वच पदार्थांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्या तारखेच्या आत त्या पदार्थांचा वापर करणे आवश्‍यक असते. नाहीतर ते पदार्थ खराब होण्याचा धोका असतो. पण आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांची एक्सपायरी डेट नसते.

तुमच्या स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ कधीच एक्सपायर होत नाहीत...
स्वयंपाक घरामधील या गोष्टी कधीही खराब होत नाहीत. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 10:41 AM
Share

बाजारातून कुठल्याही पदार्थांची खरेदी करताना आपण आधी त्यावर दिलेली एक्सपायरी डेट (expiry date) बघत असतो. एक्सपायरी डेट जवळची असेन तर आपण असे पदार्थ खरेदी करणे टाळतो. एखादी वस्तू खरेदी करीत असताना त्यावरील तारीख अवश्‍य बघण्याचा सल्ला आपणास अनेकदा दिला जात असतो. एखादी वस्तू खायची असो वा वापरायची, एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतर त्या वस्तूचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे त्यांना फेकून द्यावे लागते. पण आपल्या स्वयंपाकघरात (kitchen) अशा काही वस्तू असतात ज्यांची कधीच एक्सपायरी डेट नसते. काही गोष्टी जितक्या जुन्या (Old) होतात तितक्या चांगल्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांना फेकून देण्याची चूक कधीही करू नका… अशा पदार्थांची माहिती जाणून घेउया

तांदूळ

पांढरा तांदूळ जितके जुने तितके चांगले आणि चविष्ट लागतात. त्यामुळे तांदूळ खरेदी करताना तो जास्तीत जास्त जुना खरेदी केला जात असतो. त्यामुळे तांदळाची एक्सपायरी डेट नसते. परंतु जर तुम्ही ब्राऊन राईस वापरत असाल तर ते सहा महिन्यांत वापरावे लागेल कारण ते जास्त तेलामुळे लवकर खराब होते.

मोहरी

मोहरी खराब होत नसल्याने लोक तिला जास्त काळ ठेवतात. त्यातून निघणारे तेलही खराब होत नाही. त्यामुळे या गोष्टी जुन्या झाल्या तर फेकून देण्याची चूक करू नका. मोहरी जुनी झाली असली तरी त्यातील पोषक घटक संपत नाही.

लोणचे

लोणचे पाण्यापासून दूर ठेवले तर ते वर्षानुवर्षे खराब होत नाही. लिंबाचे लोणचे जितके जुने तितके चांगले लागते. लोणचे जुने झाल्यास ते कोरडे होत असले तरी ते खराब होत नाही. लिंबाचे जुने लोणचे पोटासाठी उत्तम औषधी मानले जात असते. त्यामुळे लोणचे जुने झाल्यावर ते खराब होते म्हणून फेकून देऊ नका.

मध

मध शुध्द असेल तर वर्षानुवर्षे ठेवले तरी ते खराब होत नाही. मध जास्त वेळ ठेवल्यानंतर गोठायला लागले किंवा खराब झाले तर समजा की ते खरे मध नाही. त्यामुळे शुध्द मध कधीही जास्त काळ ठेवल्याने खराब होत नाही.

मीठ आणि साखर

मीठ देखील जास्त काळ खराब होत नाही किंवा त्याला किडही लागत नाही. पाण्याच्या संपर्कामुळे त्यात ओलावा येऊ शकतो, परंतु तरीही ते खराब होत नाही. साखरदेखील आपण बराच काळासाठी साठवू शकता. ते लवकर खराब होत नाही.

संबंधित बातम्या : 

काय सांगता…टाईप-2 मधुमेह 90 दिवसांमध्ये बरा होता…जाणून घ्या यासाठी डाॅक्टरांनी नेमक्या कोणत्या टिप्स फाॅलो करायला सांगितल्या आहेत!

Health care : पचनक्रिया मजबूत करण्यासाठी हे पदार्थ खा, सर्व समस्या दूर राहतील!

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.