AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे रामबाण उपाय; ‘स्ट्राँग इम्युनिटी पॉवर’ चा संचार अन् शंभर रोग पळतील दूर!

जिऱ्याचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. जिऱ्यामध्ये असे अनेक पोषक तत्त्व असतात, जे शरीरातील चयापचय वाढवितात. जाणून घ्या, जिऱ्याच्या पाण्याचे सर्व फायदे.

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे रामबाण उपाय; ‘स्ट्राँग इम्युनिटी पॉवर’ चा संचार अन् शंभर रोग पळतील दूर!
Weight LossImage Credit source: tv9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 03, 2022 | 5:26 PM
Share

आजच्या काळात लठ्ठपणा (obesity) ही एक मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, बीपी, थायरॉईड आदी सर्व समस्या वेळेआधीच माणसाला घेरतात. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्कआऊटसोबतच त्या गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जे तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. आपल्या किचनमध्ये नेहमी वापरात असलेली वस्तू म्हणजे, जिरे. जिऱ्याच्या पाण्याची (Cumin water) मदत वजन कमी करण्यासाठी होत असते. व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के., व्हिटॅमिन-बी1, 2, 3, व्हिटॅमिन-ई, प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशियम, झिंक, कॉपर, लोह, कार्बोहायड्रेट असे सर्व घटक जिऱ्यामध्ये आढळतात. अशा परिस्थितीत सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच, पण शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. जिऱ्याचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर (Very beneficial) मानले जाते. जिऱ्यामध्ये असे अनेक पोषक तत्त्व असतात, जे शरीरातील चयापचय वाढवितात.

1) सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय वाढतो. चयापचय जितका जलद होईल तितक्या वेगाने चरबी जाळून त्याचे ऊर्जेत रूपांतर होते आणि शरीरातील चरबी कमी होते. पण सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्यानंतर किमान तासभर काहीही खाऊ नका.

2) पोट साफ होत नसले तरी, जिऱ्याचे पाणी जरूर प्यावे. जिरे पाणी पचनसंस्थेसाठी चांगले मानले जाते. हे शरीर बद्धकोष्ठता, अपचन, आम्लपित्त, गॅस इत्यादी सर्व समस्या दूर करते आणि तुमची पचनक्रिया गतिमान करते. जलद पचन प्रक्रियेमुळे अन्न लवकर पचते आणि शरीराला ऊर्जा मिळते. तसेच व्यक्तीच्या आत चरबी लवकर वाढत नाही.

3) पोटात सूज आली असेल तरीही जिऱ्याचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते. जिऱ्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याशिवाय जिऱ्याच्या पाण्यात विटामिन-ई मुबलक प्रमाणात आढळते, जे त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. ते तुमची त्वचा घट्ट आणि चमकदार ठेवते. त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत आणि वृद्धत्वाचा त्रास होत नाही.

4) पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे लोक वारंवार आजारी पडू लागतात. जिऱ्याचे पाणी रोज प्यायल्याने तुमच्या शरीरात अनेक पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. अशा प्रकारे, शरीर स्वतःच सर्व रोगांपासून संरक्षित आहे.

5) लठ्ठपणामुळे हाय बीपीची समस्याही अनेकदा वाढते. पण पोटॅशियम जिऱ्याच्या पाण्यात आढळते. अशा स्थितीत दररोज जिऱ्याचे पाणी प्यायल्याने हाय बीपीच्या रुग्णांना खूप फायदा होतो आणि बीपीची समस्या नियंत्रणात राहते.

6) जिरे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात साधारण एक चमचा जिरे टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी हलके कोमट करून गाळून प्यावे. हे पाणी नियमित प्या आणि त्यानंतर सुमारे तासभर दुसरे काहीही घेऊ नका.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग