AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Hindus : फक्त एकवेळच जेऊ, पण…बांग्लादेशी नेत्याची गुर्मी, भारताला ललकारल

Bangladesh Hindus : दिवसेंदिवस बांग्लादेशात भारतविरोध वाढत चालला आहे. आता तिथल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या रूहुल कबीर रिजवी या नेत्याने उघडपणे भारताला ललकारण्याचा प्रयत्न केला आहे. विरोध म्हणून त्याने त्याच्या पत्नीची भारतीय साडी जाळली.

Bangladesh Hindus : फक्त एकवेळच जेऊ, पण...बांग्लादेशी नेत्याची गुर्मी, भारताला ललकारल
BNP ruhul kabir rizvi
| Updated on: Dec 06, 2024 | 10:32 AM
Share

बांग्लादेशात अल्पसंख्यक हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच एक मोठी बातमी समोर आलीय. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) संयुक्त सरचिटणीस रूहुल कबीर रिजवी यांनी ढाका येथे आपल्या पत्नीची भारतीय साडी जाळली व भारताविरोधात प्रदर्शन केलं. रिजवी यांनी आंदोलनादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा आवाहन केलं. त्रिपुराच्या राजधानीत बांग्लादेशच्या सहायक उच्चायोगातील कथित तोडफोड आणि बांग्लादेशी झेंड्याच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी रिजवीने भारताविरोधात हे प्रदर्शन केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विरोध प्रदर्शना दरम्यान रिजवीने आपल्या पत्नीची भारतीय साडी जाळली. भारतातून येणाऱ्या वस्तू विकत घेऊ नका, असं त्याने उपस्थितांना आवाहन केलं. “ज्या लोकांनी आपला राष्ट्र ध्वज फाडला, त्यांचं कुठलही सामान आम्ही घेणार नाही” असं रिजवी म्हणाला.

“आमच्या माता-भगिनी आता भारतीय साडी परिधान करणार नाहीत. भारतीय साबण, टुथपेस्टही वापरणार नाहीत” असं रिजवी म्हणाला. “मिर्ची आणि पपईच उत्पादन आम्ही स्वत: करु. आम्हाला त्यांच्या सामानाची आवश्यकता नाही” असं रिजवी म्हणाला. “भारताने बांग्लादेशच्या संप्रभुतेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला” असा त्याने विरोध प्रदर्शनादरम्यान आरोप केला.

रिजवी काय म्हणाला?

“बांग्लादेश आत्मनिर्भर आहे. आपल्याला ज्याची गरज आहे, त्या सगळ्याच बांग्लादेश उत्पादन करु शकतो. भारतीय प्रोडक्ट्सच समर्थन करण्याऐवजी आपल्याला स्वत:च्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक केली पाहिजे” असं रिजवी म्हणाला. विरोध प्रदर्शनादरम्यान रिजवीने भारतीय नेते आणि मीडियावर निशाणा साधला. चुकीच्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला. या गोष्टींमुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडत चालले आहेत असं तो म्हणाला. “बांग्लादेश दुसऱ्या देशाच्या संप्रभुतेचा सम्मान करतो, दुसऱ्या देशांकडून आम्हाला अशाच व्यवहाराची अपेक्षा आहे” असं रिजवी म्हणाला.

‘दिवसात एकदाच जेऊ पण…’

“आम्ही कधी भारतीय झेंड्याचा अपमान करणार नाही. पण आपल्या देशाविरुद्ध चुकीची कृती सहन करणार नाही. भारतीय प्रोडक्ट्सवर बहिष्कार हे शांततामय मार्गाने ताकतवर उत्तर आहे. बांग्लादेशने याआधी सुद्धा छळ करणाऱ्यांना पराजित केलय. बांग्लादेश कुठल्याही ताकतीसमोर झुकणार नाही, भले मग आम्ही दिवसात एकदाच जेऊ. पण त्यानंतरही आम्ही गर्वाने उभे राहू, आत्मनिर्भर राहू” असं रिजवी म्हणाला.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला