AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देश चालवण्यासाठी भिक द्या हो…; थेट पंतप्रधानांनीच केली पोस्ट, लोक भडकताच पोस्ट केली डीलिट

बांगलादेशच्या ढाका येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर मोहम्मद युणूस यांनी मदतनिधीसाठी आवाहन केले. यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली. सरकारकडे पुरेसा निधी नसल्याबद्दल आणि देशाला एनजीओसारखे वागवण्याबद्दल नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या.

देश चालवण्यासाठी भिक द्या हो...; थेट पंतप्रधानांनीच केली पोस्ट, लोक भडकताच पोस्ट केली डीलिट
Bangladesh Plane Crash 1
| Updated on: Jul 23, 2025 | 12:08 PM
Share

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये भीषण विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३२ लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. बांगलादेशमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर देशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यावर टीका केली जात आहे. सरकारकडून जुन्या चिनी विमानांचा वापर का केला जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे सध्या बांगलादेशातील सरकारी प्रतिनिधींना विरोधाचा सामना करावा लागत आहे.

पोस्टमध्ये नक्की काय?

बांगलादेश लष्कराचे एक प्रशिक्षणार्थी जेट विमान माइलस्टोन स्कूलवर कोसळले होते. या दुर्घटनेत ३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर मोहम्मद युनूस यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी देशवासियांना पैसे दान करण्याचे आवाहन केले होते. या पैशातून माइलस्टोन स्कूलवरील जेट क्रॅशमध्ये मृत आणि जखमी झालेल्या कुटुंबांना मदत केली जाईल, असे नमूद केले होते. मात्र युनूस यांच्या या पोस्टमुळे बांगलादेशात राजकीय गदारोळ उडाला. विमान दुर्घटनेनंतरच्या या पोस्टवर अनेक लोकांनी युनूस सरकारवर टीका केली. अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही का? असा सवालही उपस्थित करण्यात आला.

तात्काळ डिलीट केली पोस्ट

हा वाद इतका वाढला की मोहम्मद युनूस यांना तात्काळ ती फेसबुक पोस्ट डिलीट करावी लागली. मोहम्मद युनूस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लोकांना मुख्य सल्लागार मदत आणि कल्याण निधीमध्ये दान करण्याचे आवाहन केले होते. बांगलादेशी वृत्तपत्र द डेली स्टारच्या लेखानुसार, ही पोस्ट मुख्य सल्लागाराच्या अधिकृत पेजवरून २२ जुलै २०२५ रोजी दुपारी २.०० वाजल्यानंतर प्रकाशित करण्यात आली होती. मोहम्मद युनूस यांच्या वरिष्ठ सहायक प्रेस सचिव फयेज अहमद यांनीही प्रेस विंगच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ही पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे ही पोस्ट अधिकृत खात्यातूनच केली गेली होती यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

देश चालवण्यासाठी भीक मागावी लागतेय, युजर्सच्या कमेंट्स

मोहम्मद युनूस यांच्या या फेसबुक पोस्टवर अनेकांनी तीव्र विरोध केला. अनेक राजकीय पक्षांसह सामान्य जनतेने युनूस यांच्यावर हल्ला चढवला. या फेसबुक पोस्टवर एवढा गोंधळ उडाला की याबद्दल कारण न देता ते डिलीट करण्यात सांगण्यात आले. अमीन सोनी नावाच्या एका व्यक्तीने म्हटले की युनूस साहेबांना आता देश चालवण्यासाठी भीक मागावी लागत आहे. तर दुसऱ्या युजर्सने म्हटले की, मुख्य सल्लागाराच्या अधिकृत पेजवरून अशा पोस्टचा काय अर्थ आहे? सरकारकडे पीडितांना मदत करण्यासाठी संसाधने नाहीत का? हा जनतेचा अपमान आहे. तर एकाने गेल्या वर्षीच्या पूर निधीतील १२०० कोटी बांगलादेशी रुपयांचे काय झाले? तुम्ही पुन्हा तुमची योजना घेऊन आला आहात का? आपला बांगलादेश एक राष्ट्र आहे, एनजीओ नाही, अशी टीका केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.