बांगलादेशचा माज कमी होईना, भारताबद्दल धक्कादायक विधान, थेट पंतप्रधान तारीक रहमान..

भारतात ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र, बांगलादेशच्या पंतप्रधानांनी याकडे पाठ फिरवली. यासोबतच त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले. पुन्हा एकदा भारताबद्दल धक्कादायक विधान बांगलादेशकडून करण्यात आले.

बांगलादेशचा माज कमी होईना, भारताबद्दल धक्कादायक विधान, थेट पंतप्रधान तारीक रहमान..
Bangladesh
| Updated on: Sep 14, 2026 | 7:34 AM

ब्रिक्स परिषदेचे आयोजन यंदा भारतात करण्यात आले. यावेळी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. यादरम्यान बांगलादेशकडून मोठा आरोप करण्यात आला. भारताने ब्रिक्स परिषदेच्या सदस्याला आमंत्रित केले. आमच्या पंतप्रधानांना नाही. आता बांगलादेशच्या पोटात गोळा आला. आता ब्रिक्स परिषदेत सहभागी न होण्याच्या मुद्द्यात बांगादेशकडू मोठे विधान करण्यात आले. शिवाय भारत आणि बांगलादेशच्या संबंधांवरही त्यांनी विधान केले. तारीक रहमान यांच्या सरकारमधील मंत्री हुमायूं कबीर यांनी म्हटले की, आम्ही बाकी देशांप्रमाणेच भारतासोबतही नेहमी चर्चा करू शकत नाहीत. मात्र, यादरम्यानच त्यांनी म्हटले की, आम्हाला भारतासोबतचे व्दिपक्षीय संबंध पुन्हा एकदा चांगले करून पुढे न्यायचे आहेत.

हुमायूं कबीर यांच्या माहितीनुसार, ढाका आणि दिल्लीचे 15 वर्षांचे संबंध आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहमान यांनी ब्रिक्स परिषदेकडे पाठ फिरवली. हुमायूं कबीर यांनी पुन्हा म्हटले की, बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारताने आमंत्रित केले नव्हते. आता बांगलादेशची भाषा बदलली. हुमायू कबीर यांना विचारण्यात आले की, संयुक्त राष्ट्र महासभेनंतर तारीक रहमान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घेणार का?

या प्रश्नावर उत्तर देताना हुमायूं कबीर यांनी म्हटले की, आम्ही प्रत्येक वेळी नाश्ता, लंच आणि डिनर यादरम्यान फक्त भारताबद्दल विचार करत नाहीत. आम्हाला भारताबद्दल विचार करण्याच्या सवयीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहेत. त्यातच आता पुन्हा भारताबद्दल विधान करताना बांग्लादेश दिसत आहे. भारतासोबतच संबंध बांगलादेशला सुधारवायची आहेत. मात्र, त्यांना पुढेही यायचे नाही.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध चांगले होण्यापेक्षा अधिक तणावात आहेत. त्यातच बांगलादेशकडून धक्कादायक विधान करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि चीन यांच्या अधिक जवळ बांगलादेश जात आहे. बांगलादेशचे अधिकारी काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये गेले होते. तीस्का नदीच्या कराराचा मुद्द्याही आहे. भारत आम्हाला न्याय देईल, असे बांगलादेशला वाटते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us