AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला मोठा झटका, या कारणामुळे देश सोडून जात आहेत उद्योगपती

पाकिस्तानमध्ये नुकताच निवडणुका पार पडल्या आहेत. ज्यामध्ये कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पाकिस्तान आधीच संकटात सापडला असताना आता पाकिस्तानातील व्यापारी आणि उद्योगपती देश सोडून जात आहेत. अनेक जण आपल्या कुटुंबासोबत दुबईमध्ये स्थलांतरीत झाले आहेत.

पाकिस्तानला मोठा झटका, या कारणामुळे देश सोडून जात आहेत उद्योगपती
| Updated on: Feb 12, 2024 | 8:28 PM
Share

Pakistan election : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पण कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या राजकीय परिस्थितीमुळे पाकिस्तानी व्यापारी चांगलेच घाबरले आहेत. गेल्या 20 महिन्यांत पाकिस्तानील व्यापारी आणि श्रीमंत व्यक्ती हे पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये गुंतवणूक करत आहेत. पाकिस्तानातील व्यापाऱ्यांच्या त्यांच्याच देशावर विश्वास नसल्याचं दिसून येत आहे.

व्यापारी पाकिस्तान का सोडत आहेत?

पाकिस्तानातील बऱ्याच उद्योगपतींनी त्यांचा व्यवसाय दुबईत शिफ्ट केला आहे. अनेक जण त्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम निश्चित होत आहे. पाकिस्तान आधीच दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. त्यात देशात नोकऱ्या नाहीत. त्यामुळे देशाचं मोठं नुकसान होत आहे.

व्यापारी का सोडून चाललेत?

एका रिपोर्टनुसार देशातील बिघडलेली कायदा आणि सुव्यस्था, राजकीय परिस्थिती यामुळे व्यापारी दुबईत जात आहेत. देशात खंडणीचे प्रमाण देखील वाढत आहे, त्यामुळे देखील व्यापारी चिंतेत आहेत.

अनेक व्यावसायिक आधीच कुटुंबासोबत दुबईत स्थलातरीत झाले आहेत. अनेकांनी परदेशात व्यवसाय थाटला आहे. पाकिस्तानी वस्तूंची निर्यात आणि आयात यावर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

दुबईला का पहिली पसंती?

दुबईतून व्यवसाय करणे हे सोपे काम आहे. कारण निर्यात किंवा आयातीसाठी खाती उघडण्यास कोणतीही अडचण येत नाही. दुबईमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे असते.

नवीन सरकार आल्यानंतर देखील पाकिस्तानची अर्थव्यवस्था वर आणण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. पाकिस्तानातील अस्थिरता हे देशासाठी मोठे धोक्याचे ठरत चालले आहे. पाकिस्ताना कोणत्याही सरकारला पाच वर्ष पूर्ण करणे कठीण जात आहे. पाकिस्तानचे शेजारील देशांसोबत बिघडलेले संबंध हे देखील याला जबाबदार आहेत. कारण त्यांच्यासोबत त्यांना व्यापार करणे कठिण होऊन जाते.

पाकिस्तानचे आधीच भारतासोबत संबंध बिघडले आहे. त्यानंतर आता त्यांचे इराणसोबत देखील संबंध बिघडले. चीन हा देश आपल्या फायद्यासाठी त्यांना मदत करतो. पण चीनच्या कर्जाखाली देखील ते बुडत चालले आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.